शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश रद्द

By admin | Updated: March 7, 2015 01:37 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारने मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश रद्द केल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.

भाजपाकडून बगल : विरोधकांच्या हातात मिळाले कोलीतमुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारने मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश रद्द केल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलन उभारतानाच विधिमंडळातही सरकारची कोंडी करण्याचा मनसुबा काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने शासकीय-निमशासकीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेत जुलै २०१४ मध्ये त्याबाबत दोन अध्यादेश काढले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देत मुस्लिमांचे शिक्षणातील आरक्षण कायम ठेवले. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला. मराठा आरक्षण जाहीर करतानाच मुस्लीम आरक्षणाला मात्र भाजपा सरकारने बगल दिली. आता तर मुस्लीम आरक्षणाबाबतचा अध्यादेशच रद्द करून भाजपाने हा विषय कायमचा निकाली काढला आहे.काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मुस्लीम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. तर, आरक्षणाचा निर्णय रद्द करून सरकारने अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक होणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर गेलेली व्होटबँक परत मिळविण्याची संधी आघाडीकडे आली आहे. हे ओळखूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लीम आरक्षणाचा मुद्द्याला हात घालत समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करत मुस्लीम समाजातील स्थान बळकट करण्याची रणनीतीच दोन्ही पक्षांनी आखली आहे. च्राज्यात विशेषत: मुस्लीम समाजात एमआयएमचे प्रस्थ वाढत आहे. च्काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांना याचा फटका बसल्याचे निवडणूक निकालांनी स्पष्ट झाले़च्आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे रेटण्याचे धोरण दोन्ही काँग्रेसनी स्वीकारले आहे.