शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

विरोधी पक्षातील मोठे नेते ‘टार्गेट’

By admin | Updated: February 10, 2016 01:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा यामागे

- प्रमोद गवळी, नवी दिल्लीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा यामागे डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.मिळकतीहून अधिक संपत्ती जमविल्याच्या प्रकरणात ‘ईडी’च्या कारवाईचा सामना करणाऱ्या भुजबळ कुटुंबाचे प्रमुख व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मंगळवारी अमेरिकेहून मुंबईत परतले. यावेळी मुंडे व माजी मंत्री सुनील तटकरे दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. यासंदर्भात विचारणा केली असता ही बैठक अगोदरच ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्णातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमवेत जावडेकर यांच्यासोबत बैठकीची वेळ २९ जानेवारी रोजीच निश्चित झाली होती. त्यानुसार आम्ही दिल्लीत आलो. या कालावधीत वेगवान राजकीय घडामोडी झाल्या.राष्ट्रवादीकडून कुठलेही निर्देश नाहीतभुजबळ यांच्या प्रकरणात काहीही वक्तव्य न करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत का अशी तटकरे यांना विचारणा करण्यात आली. अशा पद्धतीचे कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत. या प्रकरणात खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आम्ही बोलणे योग्य ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.मंत्र्यांविरोधात चौकशी का नाही ?विधिमंडळात आम्ही राज्यातील काही मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ््याचे पुरावे दिले आहेत. परंतु तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याविरोधात कुठलीही चौकशी करायला तयार नाहीत. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांचा लढा केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांपुरताच मर्यादित आहे, हे यातून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन मुंडे यांनी केले.चौकशीचे स्वागतचसिंचन घोटाळ््यामध्ये सुनील तटकरे यांचीदेखील चौकशी करण्यात येईल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांअगोदर दिले होते. यासंदर्भात विचारणा केली असता कुठल्याही चौकशीचे आपण स्वागत करतो. चौकशी पूर्ण झाल्यावर मी निर्दोष सिद्ध होईल, असा दावा तटकरे यांनी केला.