शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

विरोधी पक्षातील मोठे नेते ‘टार्गेट’

By admin | Updated: February 10, 2016 01:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा यामागे

- प्रमोद गवळी, नवी दिल्लीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विरोधी पक्षांचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा यामागे डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.मिळकतीहून अधिक संपत्ती जमविल्याच्या प्रकरणात ‘ईडी’च्या कारवाईचा सामना करणाऱ्या भुजबळ कुटुंबाचे प्रमुख व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मंगळवारी अमेरिकेहून मुंबईत परतले. यावेळी मुंडे व माजी मंत्री सुनील तटकरे दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. यासंदर्भात विचारणा केली असता ही बैठक अगोदरच ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्णातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमवेत जावडेकर यांच्यासोबत बैठकीची वेळ २९ जानेवारी रोजीच निश्चित झाली होती. त्यानुसार आम्ही दिल्लीत आलो. या कालावधीत वेगवान राजकीय घडामोडी झाल्या.राष्ट्रवादीकडून कुठलेही निर्देश नाहीतभुजबळ यांच्या प्रकरणात काहीही वक्तव्य न करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत का अशी तटकरे यांना विचारणा करण्यात आली. अशा पद्धतीचे कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत. या प्रकरणात खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आम्ही बोलणे योग्य ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.मंत्र्यांविरोधात चौकशी का नाही ?विधिमंडळात आम्ही राज्यातील काही मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ््याचे पुरावे दिले आहेत. परंतु तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याविरोधात कुठलीही चौकशी करायला तयार नाहीत. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांचा लढा केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांपुरताच मर्यादित आहे, हे यातून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन मुंडे यांनी केले.चौकशीचे स्वागतचसिंचन घोटाळ््यामध्ये सुनील तटकरे यांचीदेखील चौकशी करण्यात येईल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांअगोदर दिले होते. यासंदर्भात विचारणा केली असता कुठल्याही चौकशीचे आपण स्वागत करतो. चौकशी पूर्ण झाल्यावर मी निर्दोष सिद्ध होईल, असा दावा तटकरे यांनी केला.