शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

केंद्रसरकाच्या दुष्काळनिधीवर विरोधकांचे टिकास्त्र

By admin | Updated: December 29, 2015 21:34 IST

केंद्रसरकारने आज जाहीर केलेल्या ३१०० कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीवर विरोधीपक्षातून टिका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे, मिळालेला निधी कमी आणि तटपुंजा असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ - केंद्रसरकारने आज जाहीर केलेल्या ३१०० कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीवर विरोधीपक्षातून टिका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे, मिळालेला निधी कमी आणि तटपुंजा असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.राज्याच्या इतिहासात यंदाचे वर्ष सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचे ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर्जमाफी व भरीव आर्थिक मदतीच्या पॅकेजची अपेक्षा होती. शिवसेनेने ५० हजार कोटी रूपयांचे पॅकेज मागितले होते. ती मागणी लक्षात घेता भाजप-शिवसेना सरकार किमान १०-१५ हजार कोटी रूपये तरी केंद्राकडून आणेल, असे वाटत होते. परंतु, ही अपेक्षा फोल ठरली अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला मदत देण्यात केंद्र सरकारने विलंब केला. अनेक राज्याना आधीच मदत देण्यात आली. चारवेळा केंद्रीय पथक येऊन गेले. किमान ४५०० कोटी रुपये द्यायला हवे होते. आता मिळालेली मदत सावकारांच्या घश्यात न टाकता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने टाकली पाहिजे असे मत व्यक्त केले. ज्याप्रमाणे राज्य सरकारनं हेमा मालिनी यांना भुखंड देण्याकरिता तत्परता दाखवली त्याच तत्परतेनं आता गिरणी कामगारांच्या घराचा आणि दामुनगरचा प्रश्न सोडवा अशी मागणी सचिन अहीर यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले ३१०० कोटी रूपयांचे पॅकेज अपुरे असून, यातून शेतक-यांना नेमकी किती नुकसानभरपाई मिळणार? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केली आहे.दुष्काळ निवारणासाठी मदत निश्चित करणाऱ्या उच्चाधिकार समितीची बैठक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग, नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहर्षी तसेच गृह, अर्थ व कृषी मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.