शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

केंद्रसरकाच्या दुष्काळनिधीवर विरोधकांचे टिकास्त्र

By admin | Updated: December 29, 2015 21:34 IST

केंद्रसरकारने आज जाहीर केलेल्या ३१०० कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीवर विरोधीपक्षातून टिका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे, मिळालेला निधी कमी आणि तटपुंजा असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ - केंद्रसरकारने आज जाहीर केलेल्या ३१०० कोटी रूपयांच्या दुष्काळ निधीवर विरोधीपक्षातून टिका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे, मिळालेला निधी कमी आणि तटपुंजा असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.राज्याच्या इतिहासात यंदाचे वर्ष सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचे ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर्जमाफी व भरीव आर्थिक मदतीच्या पॅकेजची अपेक्षा होती. शिवसेनेने ५० हजार कोटी रूपयांचे पॅकेज मागितले होते. ती मागणी लक्षात घेता भाजप-शिवसेना सरकार किमान १०-१५ हजार कोटी रूपये तरी केंद्राकडून आणेल, असे वाटत होते. परंतु, ही अपेक्षा फोल ठरली अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला मदत देण्यात केंद्र सरकारने विलंब केला. अनेक राज्याना आधीच मदत देण्यात आली. चारवेळा केंद्रीय पथक येऊन गेले. किमान ४५०० कोटी रुपये द्यायला हवे होते. आता मिळालेली मदत सावकारांच्या घश्यात न टाकता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने टाकली पाहिजे असे मत व्यक्त केले. ज्याप्रमाणे राज्य सरकारनं हेमा मालिनी यांना भुखंड देण्याकरिता तत्परता दाखवली त्याच तत्परतेनं आता गिरणी कामगारांच्या घराचा आणि दामुनगरचा प्रश्न सोडवा अशी मागणी सचिन अहीर यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले ३१०० कोटी रूपयांचे पॅकेज अपुरे असून, यातून शेतक-यांना नेमकी किती नुकसानभरपाई मिळणार? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केली आहे.दुष्काळ निवारणासाठी मदत निश्चित करणाऱ्या उच्चाधिकार समितीची बैठक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग, नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहर्षी तसेच गृह, अर्थ व कृषी मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.