शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजच्या मुद्यावर विरोधक आक्र मक

By admin | Updated: December 10, 2014 00:46 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी. यासाठी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात

आधी पॅकेज नंतर कामकाज : विधिमंडळ परिसरात जोरदार नारेबाजीनागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी. यासाठी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य मोर्चाने आले. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी, आत्महत्यांचा मेळ नाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. अशा घोषणा देत होते. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समावेश होता.राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्या थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. आधी पॅकेजची घोषणा नंतरच चर्चा, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. राज्यातील १९ हजाराहून अधिक गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी पॅकेज मंजूर करून घोषणा करायला हवी. यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार नारेबाजी करीत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे,वीरेंद्र जगताप, राजेंद्र जैन, विद्या चव्हाण, धनंजय मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. (प्रतिनिधी)स्वस्थ बसणार नाहीशेतकरी संकटात असल्याने सरकारने आधी पॅकेजची घोषणा करावी व नंतर चर्चा घ्यावी, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका राधाकृ ष्ण विखे-पाटील यांनी मांडली.दोन हजार कोटी फारच कमीराज्यात भीषण दुष्काळ आहे. संकटग्रस्त शेकऱ्यांना मदत करण्यासाठी दोन हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आहे. तितकीच मदत शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा विचार आहे. परंतु ही रक्कम तुटपुंजी असल्याचे सुनील तटकरे म्ह्णाले.विरोधकांत एकजूटअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पॅके जच्या मुद्यावर एकजूट झाल्याचे चित्र बघायला मिळाले. जनतेच्या प्रश्नावर एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.