शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

सरसंघचालकांच्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास

By admin | Updated: August 22, 2016 19:50 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी, हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म दयावा असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी, हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. परंतु सरसंघचालकांनी असे वक्तव्य केलेच नसून त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे. देशात समान लोकसंख्या धोरण असावे या संघाच्या जुन्या मागणीसंदर्भात ते बोलले होते, असे संघाने स्पष्ट केले आहे.

आग्रा येथिल एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रीय राजकारणातदेखील यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. बसपा अध्यक्ष मायावती तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील भागवत यांच्यावर टीका केली.

सोमवारी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केले. देशात हिंदूच्या लोकसंख्या वाढीचा दर २.१ टक्के आहे, तर मुसलमानांचा ५.३ टक्के आहे. अशा स्थितीत ५० वर्षात देश मुस्लिमबहुल होईल का ?असा डॉ.भागवत यांना शिक्षकांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भारतात हिंदूंना जास्त मुलांना जन्म देण्यापासून कोणता कायदा अडवतो हे सांगा, असे सरसंघचालकांनी उत्तर दिले होते. हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ नव्हता. देशात समान लोकसंख्या धोरण असले पाहिजे हा संघाचा अगोदरपासूनचा आग्रह आहे. याकडेच सरसंघचालकांना लक्ष वेधायचे होते, असे डॉ.वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.