शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक उतरले रस्त्यावर!

By admin | Updated: March 30, 2017 04:53 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार

राकेश बोरकुंडवार / सिंदेवाहीराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार पुकारत किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला बुधवारपासून सुरुवात केली.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ते पनवेल अशी तीन टप्प्यांत ही यात्रा असून, पहिला टप्पा सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाठ) या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावातून सुरू झाला. येथील बंडू करकाडे (४२) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी संघर्ष यात्रेतील आमदारांचा ताफा या शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. या शेतकरी कुटुंबावर असलेले कर्ज दूर करण्यासाठी ही संघर्ष यात्रा पुढाकार घेईल, असे या वेळी सांगण्यात आले. या वेळी बोलताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यातील भाजपा सरकार उद्योगपतीधार्जिणे असून, उद्योजकांचे कर्ज सरकार माफ करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जाची आठवण आली नाही. सरकारमध्ये असताना केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची विसरण पडली आहे. निव्वळ या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे मागील दोन वर्षांत राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेच्या आमदारासह १५६ आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी रेटून धरली. त्यामुळे सभागृहात आर्थिक बजेटच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळविणे कठीण होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आमदारांना निलंबन करून या सरकारने आपला बचाव केला, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या वेळी आ. बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, योगेंद्र कवाडे, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते व जिल्ह्या-जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.नागपुरात संघर्षच, यात्रेतून नेते गायबया यात्रेतून नागपुरातील काँग्रेस नेते दूरच असल्याचे पाहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत.त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघाले असताना, नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप शांत झालेला नाही, असे चित्र समोर आले आहे. मार्गात अनेक ठिकाणी स्वागतया संघर्ष यात्रेचे मार्गात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. रणरणत्या उन्हातही शेतकरी स्वागतासाठी मार्गावरील अनेका गावांमध्ये प्रतीक्षेत होते. नागपूरवरून या वाहनांचा ताफा येताना कानपा, मूल, चंद्रपुरातील जनता कॉलेज चौक आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. मिळेल ते खा, बडेजाव टाळा...संघर्षयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेताना डोळ्यावर गॉगल लावू नये, मिळेल ते खावे. या काळात पांढऱ्या खादीचे वस्त्र परिधान करावे, अशा नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यात्रेची सुरुवातच एसी बसमधून झाल्याने चर्चेचा विषय ठरली.