शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विरोधक उतरले रस्त्यावर!

By admin | Updated: March 30, 2017 04:53 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार

राकेश बोरकुंडवार / सिंदेवाहीराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार पुकारत किसान कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला बुधवारपासून सुरुवात केली.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ते पनवेल अशी तीन टप्प्यांत ही यात्रा असून, पहिला टप्पा सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाठ) या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावातून सुरू झाला. येथील बंडू करकाडे (४२) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी संघर्ष यात्रेतील आमदारांचा ताफा या शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. या शेतकरी कुटुंबावर असलेले कर्ज दूर करण्यासाठी ही संघर्ष यात्रा पुढाकार घेईल, असे या वेळी सांगण्यात आले. या वेळी बोलताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यातील भाजपा सरकार उद्योगपतीधार्जिणे असून, उद्योजकांचे कर्ज सरकार माफ करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जाची आठवण आली नाही. सरकारमध्ये असताना केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आश्वासनाची विसरण पडली आहे. निव्वळ या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे मागील दोन वर्षांत राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेच्या आमदारासह १५६ आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी रेटून धरली. त्यामुळे सभागृहात आर्थिक बजेटच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळविणे कठीण होते. म्हणूनच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आमदारांना निलंबन करून या सरकारने आपला बचाव केला, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या वेळी आ. बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, योगेंद्र कवाडे, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते व जिल्ह्या-जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.नागपुरात संघर्षच, यात्रेतून नेते गायबया यात्रेतून नागपुरातील काँग्रेस नेते दूरच असल्याचे पाहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत.त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघाले असताना, नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप शांत झालेला नाही, असे चित्र समोर आले आहे. मार्गात अनेक ठिकाणी स्वागतया संघर्ष यात्रेचे मार्गात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले. रणरणत्या उन्हातही शेतकरी स्वागतासाठी मार्गावरील अनेका गावांमध्ये प्रतीक्षेत होते. नागपूरवरून या वाहनांचा ताफा येताना कानपा, मूल, चंद्रपुरातील जनता कॉलेज चौक आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. मिळेल ते खा, बडेजाव टाळा...संघर्षयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेताना डोळ्यावर गॉगल लावू नये, मिळेल ते खावे. या काळात पांढऱ्या खादीचे वस्त्र परिधान करावे, अशा नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यात्रेची सुरुवातच एसी बसमधून झाल्याने चर्चेचा विषय ठरली.