शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कर्जमाफीवर विरोधक आग्रही

By admin | Updated: December 17, 2015 02:49 IST

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी

नागपूर : सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधी व सत्तापक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी हेमंत टकले यांनी केली. सावकाराकडील कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना काय मिळाले. आत्महत्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. पिकाची पैसेवारी काढण्याची पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणी प्रा.जोगेद्र कवाडे यांनी केली. बीड जिल्ह्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांत आत्महत्येची मानसिकता का निर्माण झाली, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असे मत विनायक मेटे यांनी मांडले. राज्यात सर्वात कमी पाऊ स पश्चिम महाराष्ट्रात पडतो. साखर कारखाने बंद पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार बुडणार असून राज्याच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांविषयीची मानसिकता बदलावी, असे मत रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. राज्यातील युती सरकार लबाडाचं आहे. आजवर या सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केलेली नाही. सावकाराच्या कर्जमाफीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप हरिसिंग राठोड यांनी केला.शेतकऱ्यांचे हिताच्या योजना राबविताना अधिकारी खोटे बोलतात. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या फाईल सरकारी कार्यालयातून गहाळ होत असल्याचा आरोप ख्वाजा बेग यांनी केला. शेतकरी संघटित नसल्याने त्याची सतत अहवेलना केली जाते. बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे कर्ज घेण्याची तयारी होते. परंतु शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीच मिळत नसल्याचा आरोप डॉ. सुनील तांबे यांनी केला.टोल, एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला मग शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. प्रकाश गजभिये म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. संत्रा, सोयाबीन, कापूस व धानाला भाव नाही. मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भातील असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी मत मांडले.नागो गाणार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. तसेच कापसाला प्रति क्विंटल आठ हजार, सोयाबीनला पाच हजार तर धानाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी त्यांनी केली. बुलेट टे्रनसाठी कर्ज घेतले जाते. असेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्ज घ्यावे, असे मत रामराव वडकुते यांनी मांडले. (प्रतिनिधी)