शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

कर्जमाफीवर विरोधक आग्रही

By admin | Updated: December 17, 2015 02:49 IST

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी

नागपूर : सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधी व सत्तापक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी हेमंत टकले यांनी केली. सावकाराकडील कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना काय मिळाले. आत्महत्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. पिकाची पैसेवारी काढण्याची पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणी प्रा.जोगेद्र कवाडे यांनी केली. बीड जिल्ह्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांत आत्महत्येची मानसिकता का निर्माण झाली, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असे मत विनायक मेटे यांनी मांडले. राज्यात सर्वात कमी पाऊ स पश्चिम महाराष्ट्रात पडतो. साखर कारखाने बंद पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार बुडणार असून राज्याच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांविषयीची मानसिकता बदलावी, असे मत रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. राज्यातील युती सरकार लबाडाचं आहे. आजवर या सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केलेली नाही. सावकाराच्या कर्जमाफीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप हरिसिंग राठोड यांनी केला.शेतकऱ्यांचे हिताच्या योजना राबविताना अधिकारी खोटे बोलतात. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या फाईल सरकारी कार्यालयातून गहाळ होत असल्याचा आरोप ख्वाजा बेग यांनी केला. शेतकरी संघटित नसल्याने त्याची सतत अहवेलना केली जाते. बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे कर्ज घेण्याची तयारी होते. परंतु शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीच मिळत नसल्याचा आरोप डॉ. सुनील तांबे यांनी केला.टोल, एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला मग शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. प्रकाश गजभिये म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. संत्रा, सोयाबीन, कापूस व धानाला भाव नाही. मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भातील असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी मत मांडले.नागो गाणार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. तसेच कापसाला प्रति क्विंटल आठ हजार, सोयाबीनला पाच हजार तर धानाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी त्यांनी केली. बुलेट टे्रनसाठी कर्ज घेतले जाते. असेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्ज घ्यावे, असे मत रामराव वडकुते यांनी मांडले. (प्रतिनिधी)