शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवर विरोधक आग्रही

By admin | Updated: December 17, 2015 02:49 IST

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी

नागपूर : सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधी व सत्तापक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी हेमंत टकले यांनी केली. सावकाराकडील कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना काय मिळाले. आत्महत्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. पिकाची पैसेवारी काढण्याची पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणी प्रा.जोगेद्र कवाडे यांनी केली. बीड जिल्ह्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांत आत्महत्येची मानसिकता का निर्माण झाली, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असे मत विनायक मेटे यांनी मांडले. राज्यात सर्वात कमी पाऊ स पश्चिम महाराष्ट्रात पडतो. साखर कारखाने बंद पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार बुडणार असून राज्याच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांविषयीची मानसिकता बदलावी, असे मत रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. राज्यातील युती सरकार लबाडाचं आहे. आजवर या सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केलेली नाही. सावकाराच्या कर्जमाफीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप हरिसिंग राठोड यांनी केला.शेतकऱ्यांचे हिताच्या योजना राबविताना अधिकारी खोटे बोलतात. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या फाईल सरकारी कार्यालयातून गहाळ होत असल्याचा आरोप ख्वाजा बेग यांनी केला. शेतकरी संघटित नसल्याने त्याची सतत अहवेलना केली जाते. बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे कर्ज घेण्याची तयारी होते. परंतु शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीच मिळत नसल्याचा आरोप डॉ. सुनील तांबे यांनी केला.टोल, एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला मग शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. प्रकाश गजभिये म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. संत्रा, सोयाबीन, कापूस व धानाला भाव नाही. मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भातील असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी मत मांडले.नागो गाणार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. तसेच कापसाला प्रति क्विंटल आठ हजार, सोयाबीनला पाच हजार तर धानाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी त्यांनी केली. बुलेट टे्रनसाठी कर्ज घेतले जाते. असेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्ज घ्यावे, असे मत रामराव वडकुते यांनी मांडले. (प्रतिनिधी)