शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

कर्जमाफीवर विरोधक आग्रही

By admin | Updated: December 17, 2015 02:49 IST

सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी

नागपूर : सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. निराशेपोटी आत्महत्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधी व सत्तापक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी हेमंत टकले यांनी केली. सावकाराकडील कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना काय मिळाले. आत्महत्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. पिकाची पैसेवारी काढण्याची पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणी प्रा.जोगेद्र कवाडे यांनी केली. बीड जिल्ह्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांत आत्महत्येची मानसिकता का निर्माण झाली, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असे मत विनायक मेटे यांनी मांडले. राज्यात सर्वात कमी पाऊ स पश्चिम महाराष्ट्रात पडतो. साखर कारखाने बंद पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार बुडणार असून राज्याच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांविषयीची मानसिकता बदलावी, असे मत रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. राज्यातील युती सरकार लबाडाचं आहे. आजवर या सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केलेली नाही. सावकाराच्या कर्जमाफीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप हरिसिंग राठोड यांनी केला.शेतकऱ्यांचे हिताच्या योजना राबविताना अधिकारी खोटे बोलतात. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या फाईल सरकारी कार्यालयातून गहाळ होत असल्याचा आरोप ख्वाजा बेग यांनी केला. शेतकरी संघटित नसल्याने त्याची सतत अहवेलना केली जाते. बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटीचे कर्ज घेण्याची तयारी होते. परंतु शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीच मिळत नसल्याचा आरोप डॉ. सुनील तांबे यांनी केला.टोल, एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला मग शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. प्रकाश गजभिये म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. संत्रा, सोयाबीन, कापूस व धानाला भाव नाही. मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भातील असूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी मत मांडले.नागो गाणार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. तसेच कापसाला प्रति क्विंटल आठ हजार, सोयाबीनला पाच हजार तर धानाला तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी त्यांनी केली. बुलेट टे्रनसाठी कर्ज घेतले जाते. असेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्ज घ्यावे, असे मत रामराव वडकुते यांनी मांडले. (प्रतिनिधी)