शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘देशद्रोह’ दाखल करण्यासाठी अभियोक्त्याचे मत आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 01:40 IST

मालवणीतील मढ, अक्सा बीच येथील कारवाईमुळे पोलिसांची नाचक्की झाली असताना त्यांच्याकडून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या भारतीय दंड संहितेतील १२४(अ) हे कलम लावण्यावर

जमीर काझी, मुंबईमालवणीतील मढ, अक्सा बीच येथील कारवाईमुळे पोलिसांची नाचक्की झाली असताना त्यांच्याकडून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या भारतीय दंड संहितेतील १२४(अ) हे कलम लावण्यावर गृह विभागाने निर्बंध आणले आहेत. शासनाच्या अवमानाबाबत एखाद्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी विधी अधिकाऱ्यांचा आणि त्यानंतर पंधरवड्यात राज्याच्या सरकारी अभियोक्तांचा सल्ला घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या चपराकीनंतर गृह विभागाने पोलिसांना त्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक, आयुक्त तसेच अधीक्षकांनी आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश द्यावयाचे आहेत. पोलिसांकडून आपल्या अधिकाराचा अतिरेकी वापर होत असल्याबाबतचा आरोप वारंवार होत असतो. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालवणी पोलिसांनी मढ, अक्सा बीच व लॉजमध्ये केलेल्या कारवाईबाबत पोलिसांवर सोशल मीडियावरून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याबरोबरच ‘मॉरल पोलिसिंग’ बंद करण्याचे आदेश काढावे लागले. गस्त घालताना प्रौढ तरुण-तरुणी एकत्रित फिरत असताना किंवा हॉटेल, लॉजमधील बंद खोलीत असल्याबद्दल कारवाई करून त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत. गृह विभागानेही त्याच अनुषंगाने पोलिसांकडून भादंवि कलम १२४(अ)च्या वापराबाबत मार्गदर्शन तत्त्वे घालून दिलेली आहेत. त्यात हे कलम लावताना संबंधितांकडून तोंडी, लेखी शब्द, खुणांद्वारे अगर दृश्याद्वारे किंवा अन्य मार्गाने केंद्र किंवा राज्य सरकारबाबत द्वेष किंवा जनतेत असंतोष निर्माण करणारी तसेच हिंसाचारास प्रवृत्त करणारी असली पाहिजे. कायदेशीर मार्गाने फेरबदल घडवून आणण्यासाठी एखाद्याने केलेली कृती १२४ (क) अन्वये राष्ट्रद्रोह गणला जाऊ नये, केवळ बिभत्सता किंवा अश्लीलतेमुळे एखाद्यावर हे कलम लावू नये, तसेच कलम लावण्यापूर्वी संबंधित जिल्ह्यातील विधी अधिकाऱ्यांकडून लेखी अभिप्राय घ्यावा. त्यानंतर दोन आठवड्यांत राज्याच्या सरकारी अभियोक्तांकडून लेखी सल्ला घ्यावयाचा आहे. त्याचप्रमाणे हे कलम लागू करण्यापूर्वी प्रकरणनिहाय त्याचे गांभीर्य व अन्य बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.