शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

शेतकऱ्यांचे समाधान झाले तरच ‘समृद्धी’

By admin | Updated: July 16, 2017 01:05 IST

शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे तिथेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या जात आहेत पण, शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे तिथेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या जात आहेत पण, शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेने आधी या महामार्गाला विरोध केला होता. मात्र, सार्वजनिक उपक्रम मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात जाऊन तेथे शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी चेक दिल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषद घेतली. शिंदे हेही तेव्हा उपस्थित होते.महामार्गासाठी सुपीक जमीन घेता कामा नये. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झालेच पाहिजे, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे व त्यासाठी आम्ही सरकारला विरोध करू. महामार्गासाठी सुपीक जमीन जाऊ देणार नाही. तसेच योग्य मोबदला मिळतो की नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यापूर्वी एखादा प्रकल्प मंत्रिमंडळाने मंजूर केला की सरकारी अधिकारीच तो पुढे रेटत असत. मात्र आता एकनाथ शिंदे असतील वा शिवसेनेचे इतर मंत्री असतील ते प्रत्यक्ष जाऊन सर्व संबंधितांशी चर्चा करत आहेत. कोणाचे आक्षेप असतील तर ते ऐकून घेत आहेत. हे कदाचित प्रथमच घडत असेल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीच काळजी शिवसेनेचे मंत्री घेत आहेत. पहिल्या युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग झाला. तेव्हाही काही जणांचा विरोध होता. मात्र सर्वांचे समाधान झाल्यानंतरच सरकार पुढे गेले.आता सर्वांचे समाधान होत असेल तरच हा महामार्ग होईल. विकास करताना वा कोणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.शेतकरी स्वत:हून आले : शिंदेसुपीक जमिनी वाचवूनही हा महामार्ग होऊ शकतो. त्याबाबत मंत्री, अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांची चर्चा केली जाईल आणि त्यातून आलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, नागपूरनजीक हिंगणा येथे भूसंपादनासाठी शेतकरी शुक्रवारी स्वत:हून समोर आले. त्यांना कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती.