शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या

By admin | Updated: June 25, 2014 01:19 IST

पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही विहिरीतील पाण्यावर जगविली जात आहेत. जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पुरेशा पावसाशिवाय पेरण्या करू नका : कृषी सहसंचालकांचे शेतकऱ्यांना आवाहनयवतमाळ : पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही विहिरीतील पाण्यावर जगविली जात आहेत. जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरी १५२ मिमी पाऊस पडतो. परंतु आतापर्यंत केवळ ४१ मिमी म्हणजे २७ टक्केच पाऊस पडला आहे. पाच जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ४० लाख हेक्टर आहे. त्यापैकी केवळ दोन टक्के म्हणजे ५५ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. ही पेरणीही शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याच्या बळावर आणि मोठा धोका पत्करून केली आहे. त्यात ४८ हजार हेक्टरमध्ये प्री-मान्सून कॉटन, तीन हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन तर अडीच हजार हेक्टरमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले आहे. दरवर्षी जून अखेरपर्यंत बहुतांश पेरण्या आटोपलेल्या असतात. परंतु यावर्षी केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही ग्लास आणि गुंडाने पाणी देऊन वाचविली जात आहेत. पावसाअभावी जंगलातील चारा संपल्याने ही हिरवी पिके पक्षी आणि जनावरांचे खाद्य बनली आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दोन ते तीन दिवस सलग पाऊस आणि जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी केले आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. पेरणी झालेल्या सोयाबीनची मुळे उघडी पडली आहेत. शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करावी, जुलैमध्येही कापूस, सोयाबीन या पिकांची पेरणी करता येईल. मात्र मूग, उडीद या पिकाची पेरणी करू नये. १५ जुलैनंतर कापूस, सोयाबीन ऐवजी मका, सूर्यफूल या सारख्या पर्यायी पिकांचा विचार करावा, असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)