शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या

By admin | Updated: June 25, 2014 01:19 IST

पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही विहिरीतील पाण्यावर जगविली जात आहेत. जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पुरेशा पावसाशिवाय पेरण्या करू नका : कृषी सहसंचालकांचे शेतकऱ्यांना आवाहनयवतमाळ : पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही विहिरीतील पाण्यावर जगविली जात आहेत. जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरी १५२ मिमी पाऊस पडतो. परंतु आतापर्यंत केवळ ४१ मिमी म्हणजे २७ टक्केच पाऊस पडला आहे. पाच जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ४० लाख हेक्टर आहे. त्यापैकी केवळ दोन टक्के म्हणजे ५५ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. ही पेरणीही शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याच्या बळावर आणि मोठा धोका पत्करून केली आहे. त्यात ४८ हजार हेक्टरमध्ये प्री-मान्सून कॉटन, तीन हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन तर अडीच हजार हेक्टरमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले आहे. दरवर्षी जून अखेरपर्यंत बहुतांश पेरण्या आटोपलेल्या असतात. परंतु यावर्षी केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही ग्लास आणि गुंडाने पाणी देऊन वाचविली जात आहेत. पावसाअभावी जंगलातील चारा संपल्याने ही हिरवी पिके पक्षी आणि जनावरांचे खाद्य बनली आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दोन ते तीन दिवस सलग पाऊस आणि जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी केले आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. पेरणी झालेल्या सोयाबीनची मुळे उघडी पडली आहेत. शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करावी, जुलैमध्येही कापूस, सोयाबीन या पिकांची पेरणी करता येईल. मात्र मूग, उडीद या पिकाची पेरणी करू नये. १५ जुलैनंतर कापूस, सोयाबीन ऐवजी मका, सूर्यफूल या सारख्या पर्यायी पिकांचा विचार करावा, असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)