शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात केवळ फाईल्स फुगल्या!

By admin | Updated: June 17, 2016 02:43 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पूर्ण प्रामाणिकपणाने मदतकार्य करण्यात येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात केवळ फाईल्स फुगविण्याचेच

- प्रमोद गवळी, नवी दिल्लीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पूर्ण प्रामाणिकपणाने मदतकार्य करण्यात येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात केवळ फाईल्स फुगविण्याचेच काम झाले आहे, असा स्पष्ट आरोप स्वराज्य अभियान आणि अन्य संघटनांनी केला आहे.महाराष्ट्र हे अन्य राज्यांच्या तुलनेत सुव्यवस्थित आहे, असे आपण मानत होतो. परंतु वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आम्ही निराश झालो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तेथे उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे दिसते, असे स्वराज अभियानचे प्रमुख योगेंद्र यादव म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. स्वराज अभियानने दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मदतकार्य करण्यावरून सहा महिन्यापूर्वी याचिका दाखल केली होती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महिन्यापूर्वी कठोर निर्देशांसह आपला निकाल दिला होता. या आदेशाचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी विविध संघटनांनी पाहणी केली. स्वराज अभियानने एकता परिषद, जल बिरादरी आणि अन्य संघटनांसोबत राष्ट्रीय समन्वय साधून लातूर ते महोबा अशी ‘जल-हल पदयात्रा’ काढली होती. अशीच यात्रा तेलंगण आणि चंबळ ते बुंदेलखंड (६ ते १४ जून) पर्यंत काढण्यात आली. या दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यात आढळलेले तथ्य धक्कादायक आहे. त्यानुसार मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ आहे आणि पाणी माफियांमुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे.