शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफी हाच एकमेव निकष : पवारांनी केले घोषणेचे विश्लेषण

By admin | Updated: June 11, 2017 22:01 IST

राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 11 -  राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे काळजी वाटते. कर्जमाफीसाठी एकच निकष असावा ते म्हणजे सरसकट कर्जमाफी. निकष, तत्वत: याचे विश्लेषण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आता येऊ नये. घोषणेतील तत्वत: आणि निकष या दोन शब्दांवरून माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. सातबारा कोरा करण्यासाठी शासनाने तातडीने महसूल विभागाला आदेशित करण्याची मागणी करीत त्यांनी शासन व सुकाणू समितीचे अभिनंदन केले. सरकारच्या घोषणेच्या अंमलबजावणीवर सुकाणू समितीने, शेतकऱ्यांनी, संघटनांनी लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आ.सतीश चव्हाण, अमरसिंंह पंडीत, भाऊसााहेब चिकटगांवर, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती. पावसाळा लागला आहे, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी नवीन कर्जासाठी सहकारी सोसाट्यांकडे जाऊन कर्ज पदरात पाडून घ्यावे. भरपूर शेती उत्पादन घेण्याचे आवाहन करीत माजीमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सुकाणू समितीची मागणी होती. सरकारने काय निर्णय घेतला आहे, त्याची प्रत सध्या उपलब्ध नाहीये. राज्यातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक संप झाला. सर्व शेतकरी संघटना, नेत्यांची एकजुट यामुळे झाली. हे शेतकरी आंदोलनाचे यश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना लाभ मिळतो. परंतु मराठवाडा, विदर्भ व इतर सर्व भाग हे राज्याचे आहेत. त्यामुळे सरसकट या शब्दाचा अर्थ सर्वांना असा होतो हे मला लहानपासून कळते. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलतांना सांगितले. सरकारने निर्णय घेतला म्हणजे आर्थिक तरतूदीचा विचार केलाच असेल. डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, हमीभावाची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आणखी समाधानी होतील. राजकीय भूकंप त्यांनाच माहितीराजकीय भूकंपाचे वक्तव्य शिवसेनेच्या मुखपत्राने केले आहे. त्यामुळे त्याचा केंद्रबिंदूही तेथेच असेल. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. भूकंपांच्या मागील निश्चित कारणे त्यांनाच माहिती असतील. पंतप्रधानाची भेट आणि त्यानंतर कर्जमाफीचा सरकारचा निर्णय, यामागे पवार आहेत काय? माझ्या भेटीमुळे नाही, तर शेतकरी आणि सुकाणू समितीचे हे यश आहे. असे पवारांनी स्पष्ट केले.