शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सरसकट कर्जमाफी हाच एकमेव निकष : पवारांनी केले घोषणेचे विश्लेषण

By admin | Updated: June 11, 2017 22:01 IST

राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 11 -  राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे काळजी वाटते. कर्जमाफीसाठी एकच निकष असावा ते म्हणजे सरसकट कर्जमाफी. निकष, तत्वत: याचे विश्लेषण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आता येऊ नये. घोषणेतील तत्वत: आणि निकष या दोन शब्दांवरून माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. सातबारा कोरा करण्यासाठी शासनाने तातडीने महसूल विभागाला आदेशित करण्याची मागणी करीत त्यांनी शासन व सुकाणू समितीचे अभिनंदन केले. सरकारच्या घोषणेच्या अंमलबजावणीवर सुकाणू समितीने, शेतकऱ्यांनी, संघटनांनी लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आ.सतीश चव्हाण, अमरसिंंह पंडीत, भाऊसााहेब चिकटगांवर, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती. पावसाळा लागला आहे, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी नवीन कर्जासाठी सहकारी सोसाट्यांकडे जाऊन कर्ज पदरात पाडून घ्यावे. भरपूर शेती उत्पादन घेण्याचे आवाहन करीत माजीमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सुकाणू समितीची मागणी होती. सरकारने काय निर्णय घेतला आहे, त्याची प्रत सध्या उपलब्ध नाहीये. राज्यातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक संप झाला. सर्व शेतकरी संघटना, नेत्यांची एकजुट यामुळे झाली. हे शेतकरी आंदोलनाचे यश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना लाभ मिळतो. परंतु मराठवाडा, विदर्भ व इतर सर्व भाग हे राज्याचे आहेत. त्यामुळे सरसकट या शब्दाचा अर्थ सर्वांना असा होतो हे मला लहानपासून कळते. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलतांना सांगितले. सरकारने निर्णय घेतला म्हणजे आर्थिक तरतूदीचा विचार केलाच असेल. डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, हमीभावाची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आणखी समाधानी होतील. राजकीय भूकंप त्यांनाच माहितीराजकीय भूकंपाचे वक्तव्य शिवसेनेच्या मुखपत्राने केले आहे. त्यामुळे त्याचा केंद्रबिंदूही तेथेच असेल. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. भूकंपांच्या मागील निश्चित कारणे त्यांनाच माहिती असतील. पंतप्रधानाची भेट आणि त्यानंतर कर्जमाफीचा सरकारचा निर्णय, यामागे पवार आहेत काय? माझ्या भेटीमुळे नाही, तर शेतकरी आणि सुकाणू समितीचे हे यश आहे. असे पवारांनी स्पष्ट केले.