शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

सरसकट कर्जमाफी हाच एकमेव निकष : पवारांनी केले घोषणेचे विश्लेषण

By admin | Updated: June 11, 2017 22:01 IST

राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 11 -  राज्य शासनाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे, परंतु निकषांवर आणि तत्वत: कर्जमाफी असा उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे काळजी वाटते. कर्जमाफीसाठी एकच निकष असावा ते म्हणजे सरसकट कर्जमाफी. निकष, तत्वत: याचे विश्लेषण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आता येऊ नये. घोषणेतील तत्वत: आणि निकष या दोन शब्दांवरून माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. सातबारा कोरा करण्यासाठी शासनाने तातडीने महसूल विभागाला आदेशित करण्याची मागणी करीत त्यांनी शासन व सुकाणू समितीचे अभिनंदन केले. सरकारच्या घोषणेच्या अंमलबजावणीवर सुकाणू समितीने, शेतकऱ्यांनी, संघटनांनी लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आ.सतीश चव्हाण, अमरसिंंह पंडीत, भाऊसााहेब चिकटगांवर, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती. पावसाळा लागला आहे, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी नवीन कर्जासाठी सहकारी सोसाट्यांकडे जाऊन कर्ज पदरात पाडून घ्यावे. भरपूर शेती उत्पादन घेण्याचे आवाहन करीत माजीमंत्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सुकाणू समितीची मागणी होती. सरकारने काय निर्णय घेतला आहे, त्याची प्रत सध्या उपलब्ध नाहीये. राज्यातील शेतकऱ्यांची ऐतिहासिक संप झाला. सर्व शेतकरी संघटना, नेत्यांची एकजुट यामुळे झाली. हे शेतकरी आंदोलनाचे यश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना लाभ मिळतो. परंतु मराठवाडा, विदर्भ व इतर सर्व भाग हे राज्याचे आहेत. त्यामुळे सरसकट या शब्दाचा अर्थ सर्वांना असा होतो हे मला लहानपासून कळते. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलतांना सांगितले. सरकारने निर्णय घेतला म्हणजे आर्थिक तरतूदीचा विचार केलाच असेल. डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, हमीभावाची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आणखी समाधानी होतील. राजकीय भूकंप त्यांनाच माहितीराजकीय भूकंपाचे वक्तव्य शिवसेनेच्या मुखपत्राने केले आहे. त्यामुळे त्याचा केंद्रबिंदूही तेथेच असेल. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. भूकंपांच्या मागील निश्चित कारणे त्यांनाच माहिती असतील. पंतप्रधानाची भेट आणि त्यानंतर कर्जमाफीचा सरकारचा निर्णय, यामागे पवार आहेत काय? माझ्या भेटीमुळे नाही, तर शेतकरी आणि सुकाणू समितीचे हे यश आहे. असे पवारांनी स्पष्ट केले.