धुळे : अनावधानाने पाकिस्तानात गेलेले बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण हे भारतात परतल्यानंतर त्यांच्या आजींचे अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे.मंगळवारी चंदू यांच्या आजींचे उत्तरकार्य असून चंदू मायदेशी परतल्यानंतरच आजींचे अस्थी विसर्जन करणार असल्याची माहिती चंदूच्या आप्तेष्टांनी दिली आहे़ चंदू यांनी चुकून नियंत्रणरेषा ओलांडल्यानंतर ते पाकिस्तानच्या ताब्यात असल्याच्या माहितीनंतर त्या धक्क्याने त्यांच्या आजीचे गुरूवारी निधन झाले होते़ .
जवान चंदू परतल्यानंतरच आजींचे अस्थी विसर्जन
By admin | Updated: October 4, 2016 04:40 IST