शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

चार वर्षांत वाढले केवळ चार लाख विद्यार्थी

By admin | Updated: December 18, 2015 01:14 IST

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाममात्र भर पडली आहे.

नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाममात्र भर पडली आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण देशात गेल्या चार वर्षांत केवळ १ कोटी १० लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. याच काळात महाराष्ट्रात केवळ चार लाख मुले सरकारी शाळांशी जोडली गेली.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २००९-१० मध्ये प्राथमिकस्तरावर १८.७९ कोटी विद्यार्थी होते. २०१३-१४ मध्ये यांची संख्या वाढून १९.८९ कोटी झाली. याचा अर्थ केवळ १ कोटी १० लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. महाराष्ट्रात सन २००९-१० मध्ये सरकारी शाळांमध्ये १.५८ कोटी विद्यार्थी होते. चार वर्षांनंतर ही संख्या वाढून १ कोटी ६२ लाख झाली, म्हणजेच चार वर्षांत केवळ चार लाख विद्यार्थ्यांची भर पडली. (प्रतिनिधी)शाळांतील सुविधांविषयी सरकारचे दावेसर्व शिक्षा अभियानांतर्गत २०००-०१ पासून चालू वर्षाच्या सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व राज्यांमध्ये ३ लाख ११ हजार शाळा इमारती, १८ लाख ६१ हजार अतिरिक्त वर्गखोल्या आणि १० लाख १४ हजार शौचालये मंजूर केली गेली. यापैकी १८,२२२ शाळा इमारती, ७८,८८७ अतिरिक्त वर्गखोल्या आणि ३२,९४० शौचालयांना स्वीकृती दिली गेली. २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ शाळा’अंतर्गत २ लाख ६१ हजार ४०० शाळांमध्ये ४ लाख १७ हजार ७९६ शौचालये बांधण्यात आली. मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालये असावीत, हेही निश्चित करण्यात आले. यूडीआयएसआयनुसार संपूर्ण देशात २०१३-१४ मध्ये १४ हजार १३४ शाळांना स्वत:ची इमारत नाही. यात महाराष्ट्रातील १८२ शाळांचा समावेश आहे. तूर्तास या शाळा अस्थायी ठिकाणी भरवल्या जातात. सर्व शिक्षा अभियान सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असा दावा सरकारने केला.