शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चार वर्षांत वाढले केवळ चार लाख विद्यार्थी

By admin | Updated: December 18, 2015 01:14 IST

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाममात्र भर पडली आहे.

नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत नाममात्र भर पडली आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण देशात गेल्या चार वर्षांत केवळ १ कोटी १० लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. याच काळात महाराष्ट्रात केवळ चार लाख मुले सरकारी शाळांशी जोडली गेली.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २००९-१० मध्ये प्राथमिकस्तरावर १८.७९ कोटी विद्यार्थी होते. २०१३-१४ मध्ये यांची संख्या वाढून १९.८९ कोटी झाली. याचा अर्थ केवळ १ कोटी १० लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. महाराष्ट्रात सन २००९-१० मध्ये सरकारी शाळांमध्ये १.५८ कोटी विद्यार्थी होते. चार वर्षांनंतर ही संख्या वाढून १ कोटी ६२ लाख झाली, म्हणजेच चार वर्षांत केवळ चार लाख विद्यार्थ्यांची भर पडली. (प्रतिनिधी)शाळांतील सुविधांविषयी सरकारचे दावेसर्व शिक्षा अभियानांतर्गत २०००-०१ पासून चालू वर्षाच्या सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व राज्यांमध्ये ३ लाख ११ हजार शाळा इमारती, १८ लाख ६१ हजार अतिरिक्त वर्गखोल्या आणि १० लाख १४ हजार शौचालये मंजूर केली गेली. यापैकी १८,२२२ शाळा इमारती, ७८,८८७ अतिरिक्त वर्गखोल्या आणि ३२,९४० शौचालयांना स्वीकृती दिली गेली. २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ शाळा’अंतर्गत २ लाख ६१ हजार ४०० शाळांमध्ये ४ लाख १७ हजार ७९६ शौचालये बांधण्यात आली. मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालये असावीत, हेही निश्चित करण्यात आले. यूडीआयएसआयनुसार संपूर्ण देशात २०१३-१४ मध्ये १४ हजार १३४ शाळांना स्वत:ची इमारत नाही. यात महाराष्ट्रातील १८२ शाळांचा समावेश आहे. तूर्तास या शाळा अस्थायी ठिकाणी भरवल्या जातात. सर्व शिक्षा अभियान सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असा दावा सरकारने केला.