शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

राज्यभरात अवघ्या २९ हजार परवान्यांचे नूतनीकरण

By admin | Updated: December 19, 2015 02:20 IST

विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. परवाना नूतनीकरणाला चार वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही अवघ्या २९ हजार ४५0 रिक्षा परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणास्तव रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारण्यात आले. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर तब्बल चार वेळा मुदतवाढ नूतनीकरणासाठी देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही परिवहन विभागाच्या आवाहनाला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ डिसेंबरपर्यंत २९ हजार ४५0 परवान्यांचेच नूतनीकरण झाले. या नूतनीकरणासाठी सहमत शुल्क आकारण्यात आल्याने यातून एकूण ४५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. शेवटची मुदतवाढ देतानाच नूतनीकरण करण्यात येणारे परवाने कायमचे रद्द करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परवाना फेरवाटपाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून वाढीव मुदतीत ज्यांनी परवाना नूतनीकरण केले नाही, तसेच यापूर्वी ज्यांनी रिक्षा परवाना धारण केला आहे अशा परवानाधारकांना प्रस्तावित लॉटरी प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. अंतिम मुदत संपली३१ आॅक्टोबरपर्यंत परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर आणि पुन्हा ३0 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने १५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.