शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे

By admin | Updated: May 10, 2015 00:56 IST

आपला देश ही आजमितीस जगातील एक अवाढव्य बाजारपेठ आहे. ती अर्थातच आपल्या अफाट लोकसंख्येमुळे आहे. ही लोकसंख्या हे आपलं बलस्थान ठरवू शकते.

अनिल काकोडकर,(लेखक अणुशास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष) -

आपला देश ही आजमितीस जगातील एक अवाढव्य बाजारपेठ आहे. ती अर्थातच आपल्या अफाट लोकसंख्येमुळे आहे. ही लोकसंख्या हे आपलं बलस्थान ठरवू शकते. त्यासाठी लोकसंख्येचे रूपांतर प्रज्ञावान मनुष्यबळात करणे गरजेचे आहे. हे जे काही मिशन देशाच्या पुढ्यात आहे, त्याला योग्य धोरण आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाचे धोरण निरंतर एका विशिष्ट दिशेने कायम आणि सुसंगत राहणे अपेक्षित असते. तेच हितावहही आहे. विज्ञानाच्या प्रगतीचा देश आणि जग अशा दोन्ही पातळ््यांवर समाजाच्या हितासाठी वापर करणे आणि त्याचवेळी जगाच्या व्यासपीठावर भारताच्या नेतृत्वाची उंची वाढविणे असा दुहेरी हेतू आपल्या राष्ट्रीय धोरणाचा पाया राहिला आहे. आजवरचा अनुभव असा आहे, की सत्तांतर झाले म्हणजेच राजवट बदलली म्हणून या धोरणात कधी आमूलाग्र बदल झालेला नाही. नव्या सरकारनेही या बाबतीत कोलांटउडी मारणे अपेक्षित नाही. याचाच एक अर्थ असा, की आपला अणु कार्यक्रम आणि अंतराळ मोहिमांची दिशा कायम राहायला हवी. तसेच दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठीचे धोरणही तात्विकदृष्ट्या समान गाभ्याचे असणे अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून केंद्रातील नव्या सरकारच्या एक वर्षाच्या कारकीर्दीकडे पाहायला हवे. तसे पाहिले तर एक वर्षाचा कालावधी हा निर्णायक मतप्रदर्शनासाठी पुरेसा नाही. तरीही त्याचा धोरण आणि अंमल अशा दुहेरी मोजपट्टीवर ढोबळमानाने विचार करणे शक्य आहे.सध्याचे केंद्र सरकार दर्जेदार शिक्षणासाठी तसेच महिलांसाठी शिक्षणाच्या चांगल्या सोयी देण्यासाठी उत्सुक आहे. त्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णयही सरकारने घेतले आहेत. मुख्य म्हणजे शिक्षण आणि विकास यांच्यात सेतू उभारण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्तीही काही निर्णयातून प्रकट झाली आहे. उदाहरणच सांगायचे तर आयआयटीसारख्या संस्थांना प्रत्येकी दहा गावे दत्तक घेण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे तर एमआयटीनेही निदान पाच गावे अशा पद्धतीने दत्तक घेऊन विकासाची गंगा आणि शिक्षणाची गंगोत्री तेथवर पोहोचवण्याची अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. आपला प्रवास आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरु आहे. जगभरातील हायटेक कंपन्या तरुण प्रज्ञेच्या शोधात भारतात येत आहेत. या परिस्थितीत आपणही प्रज्ञाशोध आणि पर्याप्त वापर होत नसलेली ऊर्जामय युवा प्रज्ञा उपयोगात आणणे, हे मोठे आव्हान आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत आपली लोकसंख्या आणि उपलब्ध स्रोत यांचे प्रमाण संपन्नतेला बळ देणारं होतं. पण गेल्या शंभर वर्षांत आपली लोकसंख्या विस्फोट झाल्यासारखी विलक्षण वेगाने वाढली आहे. लोकसंख्यावाढीच्या बरोबरीने मिळकतही तितकीच वाढायला हवी. ती क्षमता आता आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये उरलेली नाही. अशा परिस्थितीत धोरणांइतकीच अंमलबजावणीही निर्णायक महत्त्वाची ठरते. नव्या सरकारच्या बाबतीत अंमलबजावणीचे काय, हा प्रश्न नि:संदिग्धपणे निकालात काढण्याची स्थिती नाही. अंमलबजावणी नीट झाली नाही तर बाह्य रूप तितकेच आकर्षक राहते, पण आत्मा हरवतो. सरकारच्या बाबत तसे घडते आहे का, हे नि:संशयपणे सांगण्यास आणखी काही काळ वाट पाहावे लागेल.अर्थात, एक बाब नक्की आहे ती अशी, शिक्षणाच्या बाबतीतल्या नियमनात हे सरकार विशेषत: मनुष्यबळ विकास मंत्रालय अडखळत आहे. नियमनामागे एक निश्चित तत्त्वज्ञान लागते. नियमांना अशा तत्त्वज्ञानाची जोड मिळते तेव्हाच शिक्षणासारख्या प्रांतात प्रभावी नियमन होऊ शकते. जनतेच्या आकांक्षा उदंड आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून त्या पुऱ्या व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. पण नियमन नीट झाले नाही तर शिक्षणाची स्थिती लाभांशाकडून दिवाळखोरीकडे जाण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच शिक्षणाच्या क्षेत्रातील नियमनाकडे गंभीरपणे पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. पण गेल्या वर्षभरातला अनुभव त्याची ग्वाही देत नाही. आमच्यासारख्यांना आयआयटीच्या संचालकांची नेमणूक ही खूप गांभीर्याने घेण्याची, महत्त्वाची बाब वाटते. दुर्दैवाने सगळ्यांना तसे नाही वाटत. त्यातूनच मग काही प्रश्न निर्माण होतात. त्याच्या तपशिलात शिरण्याचा हा प्रसंग नव्हे.