शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जुन्या चित्रांना मिळणार नवी झळाळी

By admin | Updated: July 18, 2015 01:21 IST

सुमारे शंभर वर्षांपूर्वी औरंगाबादमधील अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील चित्रांचे दस्तावेजीकरण करण्याच्या उद्देशाने तत्कालीन निजाम संस्थानने पुढाकार घेतला होता. निजाम संस्थानच्या पुरातत्त्व

- स्नेहा मोरे,  मुंबई सुमारे शंभर वर्षांपूर्वी औरंगाबादमधील अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील चित्रांचे दस्तावेजीकरण करण्याच्या उद्देशाने तत्कालीन निजाम संस्थानने पुढाकार घेतला होता. निजाम संस्थानच्या पुरातत्त्व खात्याचे संस्थापक गुलाम याझदानी यांनी सय्यद अहमद, मोहम्मद जल्लालुदीन व त्यांच्या चमूकडून लेण्यांमधील चित्रे कॅनव्हासवर चितारून घेतली. यापैकी ४२ चित्रे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असून, त्यांना नवी झळाळी देण्याचे काम सुरू केले आहे.सध्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा संग्रहालयातील आर्ट कर्न्झव्हेशन सेंटरमध्ये सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत संग्रहातील चित्र, शिल्प, छायाचित्रे, फ्रेम्स, वस्त्र आणि इन्स्टॉलेशन्स अशा विविध कलाकृतींचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अंजिठा-वेरुळ लेण्यांच्या चित्रांपासून होणार आहे. या चित्रांचा अभ्यास, संशोधन, सद्य:स्थितीची निरीक्षणे, छायाचित्रण हे सर्व काम सुरू असून त्याद्वारे विश्लेषण करून नोंदी करण्यात येत आहेत. ही चित्रे १ फुट लांब व १ फुट रुंदा या आकारापासून ६ फुट लांब व ७ फुट रुंद या आकाराची आहेत. या चित्रांना नवी झळाळी देण्यासाठी ५-६ संवर्धकांचा चमू मुख्य संवर्धक सल्लागार अनुपम शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. म्युझियम आर्ट कन्झर्व्हेशन सेंटरच्या या प्रकल्पाला एका खासगी बँकेने ५ कोटींचे आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यापैकी ३.५ कोटींचा निधी संवर्धनासाठी व १.५ कोटींचा निधी म्युझियममधील शिक्षण विभागासाठी देण्यात आला आहे.गेल्या ८९ वर्षांपासून ही चित्रे म्युझियमच्या संग्रहात आहेत. त्यामुळे चित्रे अत्यंत जुनी झाली असून चित्रांचा विश्लेषणाचा टप्पा सुरू आहे. या संपूर्ण प्रोजेक्टचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. - अनुपम शहा, मुख्य संवर्धक सल्लागारआर्ट कर्न्झव्हेशन सेंटरसाठी हा प्रकल्प आव्हानात्मक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संग्रहात असल्याने चित्रांना घड्या पडल्या होत्या. त्या घड्यांना सरळ करण्यासाठी जड काचा त्यांवर ठेवणे यापासून ते थेट चित्रांमागील कापड वेगळे करणे, त्यांची दुरुस्ती करणे, चित्रांचे छायाचित्रण अशी वेगवेगळ््या स्वरूपातील कामे सध्या सुरू आहेत. - दिलीप मेस्त्री, संवर्धक साहाय्यक