शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

अधिकाऱ्यांनी मारले, लोकसहभागाने तारले!

By admin | Updated: October 30, 2015 01:12 IST

मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर गवगवा करण्यात येत असला तरी शासकीय अधिकाऱ्यांनी मारले

मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर गवगवा करण्यात येत असला तरी शासकीय अधिकाऱ्यांनी मारले आणि लोकसहभागाने तारले अशीच गत या योजनेची झाली आहे. सिमेंट बंधाऱ्यांची कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच लोकसहभागातून झालेल्या कामांचे चांगले परिणाम समोर येत आहेत. लोकसहभागातून गावाने पुढाकार घेतला तिथेच या योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत. एकीकडे मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याचा फटका बसत असतानाच अर्धवट कामांमुळे झालेल्या थोड्याफार पावसाचे पाणीही आम्ही रोखू शकलो नाही. या योजनेचे हेच मोठे अपयश म्हणावे लागेल. या योजनेंतर्गत मराठवाड्यात ६ हजार कामे दरवर्षी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे ३४०० कोटी रुपये लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात १६८२ गावांचा समावेश होता. त्यातील ३०० गावांतील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित गावांत अजून कामांना सुरुवातच झालेली नाही. मार्च २०१६पर्यंत नवीन गावे नोंदविली जाणार आहेत. १६८२ गावांतील ५६,८२९ कामे निवडली. पैकी ३५ हजार ८१० कामे पूर्ण झाल्याचे शासनातर्फे सांगितले जात आहे. त्यांच्या हिशेबाने २१ हजार ४ कामे अपूर्ण आहेत. प्रत्यक्षात अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. एकट्या लातूर जिल्ह्यात २२५ कामे अर्धवट अवस्थेत आहेत. लघू पाटबंधारे विभागांतर्गत करण्यात आलेले पाझर तलाव दुरुस्ती, केटी दुरुस्ती आदी ३० कामे रखडल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ मनरेगा विभागांतर्गत सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, पुनर्भरण चर अशी ८२१ कामे पूर्ण झाल्याचे दाखविले जात असले तरी यातील बहुतांश कामे झालीच नसल्याचे समोर आले आहे़ उस्मानाबाद जिल्ह्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कम्पार्टमेंट बंडिंगची ४,३३५पैकी २,९४९ कामे पूर्ण झाली आहेत. अनघड दगडी बांधाची ४३२ कामे मंजूर असली तरी अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. लुज बोल्डर स्ट्रक्चरची ४४ कामे मंजूर असली तरी केवळ ८ कामे पूर्ण झाली आहेत. मातीनाला बांध दुरुस्तीची ५७ कामे मंजूर असताना अवघी ३ कामे पूर्ण झाली आहेत. बांधबंदिस्तीची ८पैकी ४ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे १ हजार ३७८ शेततळी मंजूर असून, १३४ पूर्ण झाली आहेत. साखळी सिमेंट बंधाऱ्यांची ३२३ कामे मंजूर होती. त्यापैकी ८४ कामे पूर्ण झाली आहेत. एकूण कामांचा विचार केला असता ३० हजार ३३३पैकी १३,१२७ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेवर जिल्ह्यात ४० कोटी ३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात २६६ कामे अर्धवट अवस्थेत आहेत. ग्रामविकासमंत्री ज्या मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेल्या त्या परळी तालुक्यात ३६७ कामे मंजूर आहेत. पैकी ३४१ पूर्ण झाली असून, २६ कामे रखडलेली आहेत. (लेखक ‘लोकमत’च्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक आहेत.)