शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

अधिका-यांना ‘मनमानी’ भोवली !

By admin | Updated: December 18, 2014 09:53 IST

शासनाची परवानगी न घेता राज्यपालांच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचाही आरोप

अतुल कुलकर्णी, नागपूरतब्बल २० वर्षांनंतर पहिल्यांदा जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, साहाय्यक अभियंता दर्जाच्या चार अधिकाऱ्यांना कामात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. शासनाची परवानगी न घेता राज्यपालांच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचाही आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाठवलेल्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्वाक्षरी केली व तातडीने निलंबनाचे आदेशही काढण्यात आले. यामुळे जलसंपदा विभागात खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागाच्या गैरकारभाराचे ठपके माजी मंत्र्यांवर ठेवले गेले होते. मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

या प्रकल्पाचे काम पूर्वपरवानगी शिवाय सुरु झाले होते. त्यावर अंजली दमानिया यांनी स्वत:ची जमीन जाऊ नये म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी स्वखुशीने स्वत:ची जमीन देऊन प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली होती. दरम्यान प्रकरण न्यायालयात गेल्याने सरकारने कामाची निविदा रद्द करुन राज्यपालांना कळवले होते. मात्र अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केल्याने हे निलंबन करण्यात आले आहे.

दोषारोप असे आहेत :१) योजना बाजूला ठेवण्यात यावी व पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मान्यता गृहित धरावी असे सांगूनही ते न करता निविदा निश्चित करण्यात आल्या व प्रकल्पाचे काम चालू ठेवण्यात आले.२) उंची वाढविण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता ३२७.६२ कोटीच्या वाढीव कामास मान्यता देण्यात आली. ३) उंचीवाढीच्या कामास आधी दिलेल्या निविदेशी जोडले गेले. ते करताना सक्षम आर्थिक प्राधिकरणाची मंजूरी घेतली गेली नाही.४) यामुळे खर्चात ५ टक्केपेक्षा जास्त वाढ होणार होती. त्यासाठी कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करुन त्याची मान्यता घेणे आवश्यक होते पण ते देखील केले गेले नाही.५) केंद्र शासनाची मंजूरी मिळण्यापूर्वी वन व वनेतर क्षेत्रावर काम करतानाही कोणतीच मंजूरी घेतली गेली नाही.६) कोंडाणे लघु पाटबंधारे योजनेची कामे करताना माती धरण, सर्वसाधारण आराखडा, सांडव्याचे संकल्प चित्र, यांना देखील मंजुरी न घेताच कामे सुरु करण्यात आली.७) भू संपादन, पुनर्वसन, वनजमिन, बुडीत क्षेत्र, पुरातत्व सर्वेक्षण यांचे प्रस्ताव वेळेत सादर करुन मंजूरी घेणे आवश्यक होते ते देखील केले गेले नाही.हे अधिकारी झाले निलंबितकोंडाणे ता. कर्जत, जि. रायगड येथील लघू पाटबंधारे योजनेचे काम बाजूला ठेवा, असे सांगण्यात आलेले असतानाही प्रकल्प सुरू केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विभागीय चौकशीचे आदेश दिले गेले. ती कार्यवाही देखील प्रलंबित राहिली. यामुळे अधीक्षक अभियंता रामचंद्र दगडू शिंदे, कार्यकारी अभियंता राजेश चंद्रकांत रिठे, उपविभागीय अभियंता गिरीराज किसनराव जोशी आणि शाखा अभियंता विजय रघुनाथ कासट यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.पारदर्शकता हवीच कोणतेही काम सगळ्या अटी, शर्ती पूर्ण झाल्याशिवाय करू दिले जाणार नाही. त्यात पूर्ण पारदर्शकता आणावी लागेल. कितीही मोठा अधिकारी असला तरी सरकार चुकीचे काम करणाऱ्यास पाठीशी घालणार नाही. अधिकारी आणि ठेकेदाराचे संगनमत होऊ दिले जाणार नाही. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री