शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

आराखडा रद्द झाल्यामुळे अधिकारी नाराज

By admin | Updated: April 22, 2015 04:23 IST

असंख्य घोळांमुळे वादग्रस्त ठरलेले विकास नियोजन आराखड्याचे प्रारूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरविल्यामुळे बिगर शासकीय संस्था

मुंबई : असंख्य घोळांमुळे वादग्रस्त ठरलेले विकास नियोजन आराखड्याचे प्रारूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरविल्यामुळे बिगर शासकीय संस्था, लाखो झोपडपट्टीवासी, कोळीवाडे, गावठाण, फेरीवाले यांना दिलासा मिळाला आहे़ परंतु चार वर्षांची मेहनत, करोडो रुपये, मनुष्यबळ, वेळ वाया गेल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ नवीन आराखड्याला चार महिन्यांत आकार द्यायचा कसा, याबाबतही अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़शहराच्या विकासाची दिशा ठरविणारा सन २०१४ ते २०३४ या पुढील २० वर्षांचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला होता़ मात्र यामधील असंख्य त्रुटी व घोळ दररोज नव्याने पुढे येऊ लागल्यावर सामाजिक व राजकीय दबाव वाढून अखेर मुख्यमंत्र्यांनी हा आराखडाच आज रद्द केला़ मात्र ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र प्रादेशिक विकास नियोजन कायद्याचा (एमआरटीपी) भंग असल्याचा सूर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लावला़ एमआरटीपी कायद्यानुसार आराखड्याच्या प्रारूपावर हरकती व सूचना मागविण्यात येत होत्या़ त्यानुसार आराखड्यात सुधारणा करून नियोजनाला अंतिम रूप मिळाले असते़ मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच संपूर्ण आराखडा रद्द ठरविणे खेदजनक आहे, अशी नाराजी या प्रक्रियेतील अधिकाऱ्याने व्यक्त केली़ राज्याच्या अर्थसंकल्पातही छोट्या-मोठ्या चुका होत असतात़ या चुका सुधारता येण्यासारख्या होत्या, असे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत़ (प्रतिनिधी)