शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

समाजसेवेच्या अटीवर गुन्हा रद्द

By admin | Updated: October 29, 2016 23:56 IST

दोन दिवस रस्त्यांची झाडलोट करून समाजसेवा करणे आणि विधी साह्य सेवेला ५० हजार रुपयांची देणगी देण्याच्या अटींवर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील पाच तरुणांविरुद्ध

मुंबई: दोन दिवस रस्त्यांची झाडलोट करून समाजसेवा करणे आणि विधी साह्य सेवेला ५० हजार रुपयांची देणगी देण्याच्या अटींवर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील पाच तरुणांविरुद्ध नोंदविलेला विनयभंगाचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला.या आरोपी तरुणांनी केलेल्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सैयद यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात हा आदेश दिला. या तरुणांनी येत्या ३ नोव्हेंबर रोजी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वॉर्ड आॅफिसरपुढे हजर होऊन ते सांगतील त्याप्रमाणे साफसफाईचे काम करायचे आहे. यानुसार आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहून गुन्हा रद्द करण्याचा औपचारिक आदेश ७ डिसेंबर रोजी दिला जाईल.फिर्यादी आणि आरोपी यांच्यात समेट झाल्यावर न्यायालयाने अशा प्रकारे समाजसेवेचा आदेश देण्याची अलिकडच्या काळातील ही दुसरी वेळ आहे. मध्यंतरी ठाण्याच्या एका प्रकरणात असा आदेश दिला होता.आरोपी मुले १९ ते २२ वयोगटातील आहेत व त्यांनी केल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे. शिवाय या प्रकरणातील वैशिष्ठ्यपूर्ण तथ्ये पाहता हा एकूणच समाजाविरुद्धचा व्यापक गुन्हा असल्याचे आम्हाला वाटत नसल्याने हा ‘एफआयआर’ रद्द करण्यास आम्ही राजी होत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले.एका १७ वर्षांच्या मुलीने केलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पोलिसांनी गेल्या २५ सप्टेंबर रोजी बदलापूर पोलिसांनी या पाचजणांविरुद्ध भादंवि कलम ३५४ (महिलेचा विनयऊंग करणे), ३२३ (जाणूनबुजून इजा करणे), ५०७ (दमदाटी करणे) व १४९ (दंगामस्ती करणे) अन्वये ‘एफआयआर’ नोंदविला होता.ज्या दोन मुलींचा विनयभंग झाल्याची तक्रार होती त्यांच्यापैकी एकीची या पाचजणांपैकी एकाशी ओळख होती. तो तिच्याबरोबर शाळेत शिकायचा. या मुलाच्या एका मित्राला अपघात झाला होता व त्याच्यावर उपचार सुरु होते. तक्रारदार मुलगी आपल्या मैत्रीणीसोबत या जखमी मुलाला भेटायला गेली तेव्हा तिच्या ओळखीच्या मुलाने तिच्या मैत्रीणीच्या त्या जखमी मुलाशी असलेल्या संबंधांत आक्षेप घेतला व त्याने तिला ताबडतोब भेटायला यायला सांगितले. या दोन मुली त्याला भेटायला गेल्या तेव्हा तेथे त्याचे इतर मित्रही होते व तेव्हा वरील प्रकार घडला. (विशेष प्रतिनिधी)मुलीच्या आईचे प्रतिज्ञापत्रतक्रारदार मुलीच्या आईने प्रतिज्ञापत्र करून न्यायालयास सांगितले की, दोघांमध्ये समेट झाला असल्याने प्रकरण मिटविले जावे. माझ्या मुलीला पोलीस ठाण्यात व कोर्टात खेटे घालायला लागू नयेत म्हणून आणि आरोपींनी पश्चात्ताप व्यक्त केला असल्याने त्यांच्याविरुद्धचा ‘एफआयआर’ रद्द करण्यास आपली हरकत नाही.