शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार

By admin | Updated: June 10, 2015 02:09 IST

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे.

संतोष मिठारी, कोल्हापूरअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. शिवाय त्यांना अनुत्तीर्ण विषय सोडविण्यासाठी करावी लागणारी आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार आहे.इयत्ता दहावी, बारावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर फेरपरीक्षेचा हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान बारावी आणि दहावीची परीक्षा घेतली जाते. तिचा निकाल मे-जूनमध्ये जाहीर केला जातो. शिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर ते आॅक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर केला जातो. यात बारावीचा विद्यार्थी उत्तीर्ण झाला तरी त्याला पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जूनची प्रतीक्षा करावी लागते.दहावीसाठी गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण मंडळाने पदवी शिक्षणाप्रमाणे ‘एटीकेटी’ची सुविधा सुरू केली आहे. यात विद्यार्थी एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी संबंधिताला अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळतो. बारावीत जाण्यापूर्वी आॅक्टोबर आणि मार्चच्या परीक्षेत दहावीचे राहिलेले विषय सोडविणे बंधनकारक आहे. त्याचा चांगला परिणाम झाला आहे. गेल्या पाच वर्षांतील निकाल पाहता, दहावी आणि बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सरासरी १० ते १२ टक्के आहे. आता शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची मेमध्ये फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्याचा फायदा अधिकतर बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण, त्यांना ‘एटीकेटी’ची सुविधा नाही. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणार आहे. शिवाय, उच्च शिक्षणातील प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार आहे.-------------दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ची सुविधा देण्यात येत आहे. मात्र, बारावीसाठी अशी सुविधा नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार फेरपरीक्षेचा पर्याय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. - गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ