शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गावाला हक्काचा इंजिनिअर

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

पंचायत सक्षमीकरण अभियान : जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश

रहिम दलाल - रत्नागिरी स्थानिक विकासाचे केंद्र म्हणून ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ मोठ्या ग्रामपंचायती विकसित करण्यासाठी व त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामाचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास फार उशीर होतो. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरच विकासकामाचे मूल्यांक होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील, या हेतूने शासनाने हे पाऊल उचलले आहे.राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करणार आहेत. त्याचबरोबर त्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करणे तसेच कामाच्या मुल्यांकनासह पूर्णत्त्वाचा दाखलाही हे अभियंतेच देणार आहेत. सुमारे ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियंते नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २१ ग्रामपंचायती आहेत. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अभियंत्यांमुळे विकासकामे लवकर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे वाडी, वस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.गावच्या विकासासाठी...अभियंत्यांवरील जबाबदाऱ्याग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामासाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख करणे, मोजमाप व मुल्यांकन करणे आदी जबाबदाऱ्या या अभियंत्यांना पार पाडाव्या लागणार आहेत.गावचा विकास गावच्या हातीग्रामपंचायतींत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्या गावची प्रत्यक्ष पाहणी करुन या अंभियत्याला विकास आराखडा तयार करण्यास सोयीचे जाणार आहे. त्यामुळे योग्य प्रकारे गावचा विकास साधला जाणार आहे.मंडणगड, लांजातील ग्रा. पं. नाहीमंडणगड आणि लांजा या दोन तालुक्यांमध्ये ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एकही ग्रामपंचायत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये अभियंता नियुक्तीच्या निकषात एकही ग्रामपंचायत बसत नसल्याने तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीमध्ये अभियंत्याची नियुक्ती करण्यात येणार नाही. विकासाचा मार्ग खुलाग्रामीण भागामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत होते. त्यामुळे विकासकामे करताना अनेक अडचणींसह बराच कालावधी वाट पाहावी लागत होती. त्यामुळे केंद्रातील तत्कालीन आघाडी शासनाने अभियंते नियुक्त्यांच्या माध्यमातून विकासाचा मार्ग खुला केला आहे.तालुकाग्रामपंचायत दापोलीबुरोंडी, गिम्हवणे, दाभोळ, हर्णै, जालगाव.खेड भरणे.चिपळूणपोफळी बुद्रुक, सावर्डे, गुहागरपाटपन्हाळे, पालशेत. खेर्डी.संगमेश्वरकडवई, नावडी. रत्नागिरीपावस, करबुडे, नाचणे, कुवारबाव, गोळप, मिरजोळे, शिरगाव.राजापूर सागवे.२१ ग्रामपंचायतींमध्ये होणार अभियंत्यांच्या नियुक्त्याथेट ग्रामपंचायतीमधून होणार विकास कामे५००० पेक्षा जास्त लोकसंख्येचा निकषग्रामपंचायती होणार तांत्रिकदृष्ट्या सक्षमगावच्या विकासाला गती मिळणार.