शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गावाला हक्काचा इंजिनिअर

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

पंचायत सक्षमीकरण अभियान : जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश

रहिम दलाल - रत्नागिरी स्थानिक विकासाचे केंद्र म्हणून ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ मोठ्या ग्रामपंचायती विकसित करण्यासाठी व त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामाचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास फार उशीर होतो. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरच विकासकामाचे मूल्यांक होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील, या हेतूने शासनाने हे पाऊल उचलले आहे.राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करणार आहेत. त्याचबरोबर त्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करणे तसेच कामाच्या मुल्यांकनासह पूर्णत्त्वाचा दाखलाही हे अभियंतेच देणार आहेत. सुमारे ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियंते नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २१ ग्रामपंचायती आहेत. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अभियंत्यांमुळे विकासकामे लवकर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे वाडी, वस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.गावच्या विकासासाठी...अभियंत्यांवरील जबाबदाऱ्याग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामासाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख करणे, मोजमाप व मुल्यांकन करणे आदी जबाबदाऱ्या या अभियंत्यांना पार पाडाव्या लागणार आहेत.गावचा विकास गावच्या हातीग्रामपंचायतींत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्या गावची प्रत्यक्ष पाहणी करुन या अंभियत्याला विकास आराखडा तयार करण्यास सोयीचे जाणार आहे. त्यामुळे योग्य प्रकारे गावचा विकास साधला जाणार आहे.मंडणगड, लांजातील ग्रा. पं. नाहीमंडणगड आणि लांजा या दोन तालुक्यांमध्ये ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एकही ग्रामपंचायत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये अभियंता नियुक्तीच्या निकषात एकही ग्रामपंचायत बसत नसल्याने तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीमध्ये अभियंत्याची नियुक्ती करण्यात येणार नाही. विकासाचा मार्ग खुलाग्रामीण भागामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत होते. त्यामुळे विकासकामे करताना अनेक अडचणींसह बराच कालावधी वाट पाहावी लागत होती. त्यामुळे केंद्रातील तत्कालीन आघाडी शासनाने अभियंते नियुक्त्यांच्या माध्यमातून विकासाचा मार्ग खुला केला आहे.तालुकाग्रामपंचायत दापोलीबुरोंडी, गिम्हवणे, दाभोळ, हर्णै, जालगाव.खेड भरणे.चिपळूणपोफळी बुद्रुक, सावर्डे, गुहागरपाटपन्हाळे, पालशेत. खेर्डी.संगमेश्वरकडवई, नावडी. रत्नागिरीपावस, करबुडे, नाचणे, कुवारबाव, गोळप, मिरजोळे, शिरगाव.राजापूर सागवे.२१ ग्रामपंचायतींमध्ये होणार अभियंत्यांच्या नियुक्त्याथेट ग्रामपंचायतीमधून होणार विकास कामे५००० पेक्षा जास्त लोकसंख्येचा निकषग्रामपंचायती होणार तांत्रिकदृष्ट्या सक्षमगावच्या विकासाला गती मिळणार.