शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

आयत्या वेळी मार्ग बदलल्यानं रेल्वे प्रवाशांची तारांबळ

By admin | Updated: July 5, 2016 18:45 IST

पुण्याहून दर सोमवारी संध्याकाळी सात वाजून ५० मिनिटांनी गाडी क्रमांक ११०९२ न्यू भूज ही गुजरातसाठी रवाना होते. सोमवारी देखील ही गाडी आपल्या नियमित वेळेत रवाना झाली

आयत्या वेळी मार्ग बदलल्यान न्यू भूज गाडी 15 तास उशीरानेपुणे : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते पालघर या मार्गा दरम्यान रविवारी मध्यरात्री मालगाडीचे डब्बे घसरल्याने उत्तर भारतातून पुण्यात येणाऱ्या तसेच जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे मंगळवारी नियोजन कोसळले. मात्र, या घटनेचा सर्वाधिक फटका सोमवारी पुण्यातून गुजरातला जाणा-या प्रवाशांना बसला. या दुर्घटने मुळे पुणे-न्यू भूज ही गाडी आयत्या वेळी कर्जत मार्गे भुसावळवरून गुजरातला नेण्यात आली. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा तब्बल १५ तास उशीराने ही गाडी भूजला पोहचली अचानक मार्ग बदलण्यात आल्याने अनेक प्रवाशांना कर्जत मध्येच गाडी मिळेल ते वाहन घेऊन आपला प्रवास पुर्ण करावा लागला.

पुण्याहून दर सोमवारी संध्याकाळी सात वाजून ५० मिनिटांनी गाडी क्रमांक ११०९२ न्यू भूज ही गुजरातसाठी रवाना होते. सोमवारी देखील ही गाडी आपल्या नियमित वेळेत रवाना झाली. कर्जत-कल्याण-दिवा आणि वसईमार्गे गुजरात हा या गाडीचा ठरलेला मार्ग. मात्र, अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील मार्गात बदल झाल्याने ही गाडी दौंड-मनमाड-भुसावळ मार्गे घेवून जाणे अपेक्षित होते. मात्र, अधिका-यांच्या मनमानी कारभार तसेच रेल्वेच्या ढीसाळ यंत्रणेमुळे तसे न करता वेळेत निघालेली ही गाडी कर्जत-पनवेल-कल्याण-नाशिक-मनमाड-भुसावळमार्गे नेण्यात आली. गाडी पनवेलवरून घेवून गेल्याने ३५ मिनिटांऐवजी सुमारे दोन तास उशीर झाला. तसेच पुढे देखील ल ही गाडी अशीच फिरवत नेल्यास तब्बल ३५ तासानंतर ही गाडी गुजरातला पोहचली.

इतर वेळी १९ तासांत ही गाडी गुजरातला जाते. तर या गाडीचा मार्ग अचानक बदलण्यात आल्याने कर्जतच्या पुढे वापी तसेच वसई मार्गे गुजरातकडे जाणा-या अनेक प्रवाशांना ही गाडी सोडून देत प्रवासासाठी इतर वाहनांचा रस्ता धरावा लागला. दरम्यान रविवारी झालेल्या या अपघाताचे परिमाण मंगळवारी देखील जाणवले. देशभरातून पुण्यात येणाऱ्या अनेक उशीराने दाखल झाल्या. त्यामुळे मंगळवारी या गाड्यांना मार्गस्थ होण्यासाठीही तीन ते चार तासांचा उशीर झाला. इंदौर-पुणे, अहमदाबाद -पुणे-दुरंतो अशा गाड्यांचा त्यात समावेश आहे. या दोन्ही गाडया नियमित वेळापेक्षा तीन ते चार तास उशीराने रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. =====================

पश्चिम रेल्वेवर अपघात झाल्याने या न्यू भूज गाडी दौंड वरून भुसावळ आणि गुजरातला घेऊन जाणे सोयीस्कर होते. त्यानंतरही ही गाडी कर्जत मार्गे नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा कर्जत मध्ये अचानक तिचा मार्ग बदलण्यात आला. त्यामुळे जवळपास 15 तास ही गाडी उशीराने पोहचली. अशा प्रकारे प्रवाशांची गैरसोय अपेक्षीत नाही.त्यामुळे रेल्वेकडून तत्काळ या प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. -हर्षा शहा (रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा)