शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

ओबीसी मंत्रालयावरून जुंपली

By admin | Updated: December 28, 2016 04:51 IST

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग निर्माण करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग निर्माण करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी हा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे.ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर डोळा ठेऊन हा निर्णय घेतला आहे. ओबीसींसाठी सरकार वेगळे काही करेल असे वाटत नाही, असेही विखे म्हणाले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, केवळ अधिकाऱ्यांची सोय करण्यासाठी हे खाते निर्माण करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले खरे, परंतु ओबीसींसाठी मंडळ आयोग लागू करण्यापासून इतर अनेक निर्णय शरद पवार यांनी घेत्याची आठवणही करून दिली. तर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती या मंत्रालयाचे स्वरुप निश्चित करेल. या विभागासाठी स्वतंत्र मंत्रीदेखील दिला जाईल. या विभागाचे नामकरण ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग विभाग’ असे करण्यात आले आहे.हा विभाग १ एप्रिल २०१७ पासून ते स्वतंत्रपणे कार्यरत होईल. त्यात पुणे येथील विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग संचालनालय तसेच इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व त्यांची कार्यालये आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ व त्यांची कार्यालये वर्ग करण्यात येतील. या नवीन विभागासाठी स्वतंत्र सचिव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ५१ पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी ४ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार, च्या जनगणनेनुसार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींची लोकसंख्या ३ कोटी ६८ लाख ८३ हजार इतकी आहे. (विशेष प्रतिनिधी)