शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

ओबीसी मंत्रालयावरून जुंपली

By admin | Updated: December 28, 2016 04:51 IST

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग निर्माण करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग निर्माण करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी हा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे.ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर डोळा ठेऊन हा निर्णय घेतला आहे. ओबीसींसाठी सरकार वेगळे काही करेल असे वाटत नाही, असेही विखे म्हणाले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, केवळ अधिकाऱ्यांची सोय करण्यासाठी हे खाते निर्माण करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले खरे, परंतु ओबीसींसाठी मंडळ आयोग लागू करण्यापासून इतर अनेक निर्णय शरद पवार यांनी घेत्याची आठवणही करून दिली. तर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती या मंत्रालयाचे स्वरुप निश्चित करेल. या विभागासाठी स्वतंत्र मंत्रीदेखील दिला जाईल. या विभागाचे नामकरण ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग विभाग’ असे करण्यात आले आहे.हा विभाग १ एप्रिल २०१७ पासून ते स्वतंत्रपणे कार्यरत होईल. त्यात पुणे येथील विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग संचालनालय तसेच इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व त्यांची कार्यालये आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ व त्यांची कार्यालये वर्ग करण्यात येतील. या नवीन विभागासाठी स्वतंत्र सचिव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ५१ पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी ४ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार, च्या जनगणनेनुसार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातींची लोकसंख्या ३ कोटी ६८ लाख ८३ हजार इतकी आहे. (विशेष प्रतिनिधी)