शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली!

By admin | Updated: January 12, 2015 03:00 IST

दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़

अकोला : दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़ मराठवाड्यात परिस्थिती भयावह असून, विदर्भातील स्थिती मात्र सध्या नियंत्रणात हे. पावसाळ््यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊ झाल्याने उन्हाळ््यात पाणीटंचाई जाणविणार हे गृहित धरून प्रशासाने सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. डिसेंबरपासूनच राज्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली. १ डिसेंबरपर्यंत राज्यात ७८ गावे आणि १५९ वाड्यांमध्ये ७३ शासकीय आणि ५१ खासगी, असे एकूण १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिनाभरात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १५९ गावे आणि २१७ वाड्यांमध्ये २३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ११७ शासकीय आणि ११६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक परिस्थिती मराठवाड्यात असून, मराठवाड्यातील ८ जिल्ह्णांत १२0 गावे आणि ३४ वाड्यांना १७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पश्चिम महाराष्ट्रात ५ जिल्ह्णात ८ गावे आणि १९ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात पाच जिल्ह्णांत २५ गावे आणि १११ वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्णात ४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील स्थिती मात्र फारशी गंभीर नाही. मात्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता येथेही लवकरच टँकरची मागणी होऊ शकते. (प्रतिनिधी)