शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

आता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म

By admin | Updated: January 18, 2017 06:58 IST

राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे 'नमुना-२ (ब)' हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे.

गजानन मोहोड,

अमरावती- राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे 'नमुना-२ (ब)' हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे. पूर्वी छाननीच्या दिवसापर्यंत हे नमुनापत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना होती. तथापि, नियमात करण्यात आलेल्या ताज्या बदलानंतर उमेदवारांनी आणि पक्षांची धावपळ वाढणार आहे.राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषद व २८३ पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम ११ जानेवारीला जाहीर झाला आहे. विविध राजकीय पक्षांद्वारे अधिकृत उमेदवारांना पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी विहित नमुन्यात पत्र देण्यात येते. त्याला नमुना २ (ब) पत्र असे संबोधतात. हे पत्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजेच छाननीच्या तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याची मुभा उमेदवारांना होती. ग्रामविकास विभागाने काढलेल्या व शासनाद्वारे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार आता हे पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेस दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक झाले आहे. राजकीय पक्षांना उमेदवारी यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नमुना २ (ब) देण्याची घाई करावी लागणार आहे. >दोन टप्पे, दोन तारखापहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद व १६५ पंचायत समितींसाठी निवडणुका होतील. त्यासाठी १ फेब्रुवारीला नमुना पत्र सादर करता येईल. दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींसाठी ६ फेबु्रवारीला नमुना पत्र देणे अनिवार्य आहे. नमुना पत्र न दिल्यास उमेदवार अपक्ष मानण्यात येईल.पक्षाच्या पत्रात हा उल्लेख महत्त्वाचाउमेदवाराने अर्जात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे, त्याचा उल्लेख केला नसेल व त्यास एखाद्या पक्षाचा नमुना २ (ब) प्राप्त झाला, तरी तो पक्षाचा अधिकृत उमेदवार राहणार नाही.उमेदवाराने अर्जात जरी तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्याचा उल्लेख केला, तथापि त्यास पक्षाने नमुना २ (ब) दिला नाही, तर तो पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरणार नाही.