शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कामचुकार अधिकाऱ्यांना आता घरी पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 05:53 IST

राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे.

नागपूर : राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे. मात्र काही अधिकारी कामचुकार असून त्यांच्यात सुधारणा व्हायला वेळ लागतो आहे. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात येईल. तशी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. नागपूर येथे त्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.राज्य चालवत असताना अधिकाऱ्यांचे सहकार्य हा महत्त्वाचा भाग असतो. मागे माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला होता व अधिकारी माझे ऐकतच नाही असा अपप्रचार झाला होता. मुळात दोन वर्षांच्या कार्यकाळात सरकारने राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. विद्यापीठांच्या प्रगतीला चालना देणाऱ्या नवीन विद्यापीठ कायद्यासंदर्भातदेखील वेगाने कार्यवाही सुरू आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या चिकित्सा समितीचे जवळपास सर्वच मुद्यांवर एकमत झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हा कायदा नक्की मंजूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत लोकल सेवांना अधिक वेगवान करण्यात येणार असून ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ करण्यात येईल. यामुळे दुप्पट प्रवासी सहज प्रवास करू शकतील, असे त्यांनी सांगितले.>मंत्र्यांनी भूमिका बदलावीसत्ता येण्याअगोदर १५ वर्षे आम्ही विरोधी पक्षांत होतो. त्यामुळे आमचा ‘डीएनए’च विरोधकांचा झाला होता. मुख्यमंत्री झाल्यावर मीदेखील त्याच त्वेषाने विधिमंडळात बोलायचो. मात्र त्यानंतर मी सुधारणा केली. राज्यातील काही मंत्र्यांची अद्यापही तशीच मानसिकता आहे. कुठलीही मागणी करताना आपण सत्तेत आहोत, याचा विचार करायला हवा. मंत्र्यांनी आपल्या भूमिकेला बदलावे असे त्यांना सांगण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

>काही सिंचन प्रकल्प गळ्यातील धोंडराज्यात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. यातील काही प्रकल्प अक्षरश: गळ्यातील धोंड बनले आहेत. यावर उपाय म्हणून आम्ही विभागीय व राज्य पातळीवर तांत्रिक सल्लागार समिती नेमल्या असून, यामार्फत एकेका प्रकल्पाचे मूल्यमापन सुरू आहे. समितीने मान्यता दिल्यावरच अपूर्ण प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी ‘कॅबिनेट’समोर ठेवण्यात येते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.>विदर्भाचा विकास पाहून पोटात का दुखते?गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भात विकासाचा अनुशेष आहे. गेल्या दोन वर्षांपासून विदर्भ-मराठवाडा येथे विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विकासाचा अनुशेष दूर व्हावा ही आमची भूमिका आहे. या भागाचा विकास होत असेल तर इतर लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता काढला.