शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार अधिकाऱ्यांना आता घरी पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 05:53 IST

राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे.

नागपूर : राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे. मात्र काही अधिकारी कामचुकार असून त्यांच्यात सुधारणा व्हायला वेळ लागतो आहे. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात येईल. तशी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. नागपूर येथे त्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.राज्य चालवत असताना अधिकाऱ्यांचे सहकार्य हा महत्त्वाचा भाग असतो. मागे माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला होता व अधिकारी माझे ऐकतच नाही असा अपप्रचार झाला होता. मुळात दोन वर्षांच्या कार्यकाळात सरकारने राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. विद्यापीठांच्या प्रगतीला चालना देणाऱ्या नवीन विद्यापीठ कायद्यासंदर्भातदेखील वेगाने कार्यवाही सुरू आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या चिकित्सा समितीचे जवळपास सर्वच मुद्यांवर एकमत झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हा कायदा नक्की मंजूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत लोकल सेवांना अधिक वेगवान करण्यात येणार असून ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ करण्यात येईल. यामुळे दुप्पट प्रवासी सहज प्रवास करू शकतील, असे त्यांनी सांगितले.>मंत्र्यांनी भूमिका बदलावीसत्ता येण्याअगोदर १५ वर्षे आम्ही विरोधी पक्षांत होतो. त्यामुळे आमचा ‘डीएनए’च विरोधकांचा झाला होता. मुख्यमंत्री झाल्यावर मीदेखील त्याच त्वेषाने विधिमंडळात बोलायचो. मात्र त्यानंतर मी सुधारणा केली. राज्यातील काही मंत्र्यांची अद्यापही तशीच मानसिकता आहे. कुठलीही मागणी करताना आपण सत्तेत आहोत, याचा विचार करायला हवा. मंत्र्यांनी आपल्या भूमिकेला बदलावे असे त्यांना सांगण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

>काही सिंचन प्रकल्प गळ्यातील धोंडराज्यात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. यातील काही प्रकल्प अक्षरश: गळ्यातील धोंड बनले आहेत. यावर उपाय म्हणून आम्ही विभागीय व राज्य पातळीवर तांत्रिक सल्लागार समिती नेमल्या असून, यामार्फत एकेका प्रकल्पाचे मूल्यमापन सुरू आहे. समितीने मान्यता दिल्यावरच अपूर्ण प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी ‘कॅबिनेट’समोर ठेवण्यात येते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.>विदर्भाचा विकास पाहून पोटात का दुखते?गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भात विकासाचा अनुशेष आहे. गेल्या दोन वर्षांपासून विदर्भ-मराठवाडा येथे विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विकासाचा अनुशेष दूर व्हावा ही आमची भूमिका आहे. या भागाचा विकास होत असेल तर इतर लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता काढला.