शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता पोषण आहार धोरण आणणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 07:01 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्याच्या मुद्यावर राज्य सरकार घेरले गेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुंबई : पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्याच्या मुद्यावर राज्य सरकार घेरले गेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची आपल्या वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. लालफितशाहीमध्ये निर्णय अडकविण्याऐवजी आदिवासी भागातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे काम करा, अशी कानउघाडणी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, राज्याचे पोषण आहार धोरण येत्या १५ दिवसांत तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालघर, ठाणे, नंदूरबार, नाशिक, धुळे अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, अहमदनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरिन्संगच्या माध्यमातून संवाद साधत कुपोषण निर्मुलनाबाबतचा आढावा घेतला.महिला व बालविकास, आरोग्य आदी विभागांमधील रिक्त पदांची संख्या आणि ते भरण्यासाठी उपाय होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या आदर्श योजना केवळ कागदावर ठेवू नका; प्रत्यक्षात आणा, अशा शब्दात त्यांनी मंत्री, अधिकाऱ्यांचे कान टोचले. या बैठकीपूर्वी माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. आदिवासी भागात रोजगार निर्मितीद्वारे दारिद्य निर्मूलन होऊ शकेल, असे मत विवेक पंडित यांनी यावेळी मांडले. या संदर्भात एक कृती आराखडा तयार करा असे मुख्यमंत्र्यांनी पंडित यांना सुचविले. शिष्टमंडळात बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तू कोळेकर, सुरेश रेंजड, अशोक सपाटे, नंदा वाघे, प्रमोद पवार आदींचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)