शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आता पोषण आहार धोरण आणणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 07:01 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्याच्या मुद्यावर राज्य सरकार घेरले गेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुंबई : पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्याच्या मुद्यावर राज्य सरकार घेरले गेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची आपल्या वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. लालफितशाहीमध्ये निर्णय अडकविण्याऐवजी आदिवासी भागातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे काम करा, अशी कानउघाडणी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, राज्याचे पोषण आहार धोरण येत्या १५ दिवसांत तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालघर, ठाणे, नंदूरबार, नाशिक, धुळे अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, अहमदनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरिन्संगच्या माध्यमातून संवाद साधत कुपोषण निर्मुलनाबाबतचा आढावा घेतला.महिला व बालविकास, आरोग्य आदी विभागांमधील रिक्त पदांची संख्या आणि ते भरण्यासाठी उपाय होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या आदर्श योजना केवळ कागदावर ठेवू नका; प्रत्यक्षात आणा, अशा शब्दात त्यांनी मंत्री, अधिकाऱ्यांचे कान टोचले. या बैठकीपूर्वी माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. आदिवासी भागात रोजगार निर्मितीद्वारे दारिद्य निर्मूलन होऊ शकेल, असे मत विवेक पंडित यांनी यावेळी मांडले. या संदर्भात एक कृती आराखडा तयार करा असे मुख्यमंत्र्यांनी पंडित यांना सुचविले. शिष्टमंडळात बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तू कोळेकर, सुरेश रेंजड, अशोक सपाटे, नंदा वाघे, प्रमोद पवार आदींचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)