शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

आता पर्यटनस्थळी पोलीस दल

By admin | Updated: March 10, 2016 03:45 IST

२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून राज्य शासनाने घोषित केले असून, पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या नव्या पर्यटन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.

यदु जोशी,  मुंबई२०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून राज्य शासनाने घोषित केले असून, पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या नव्या पर्यटन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी हवाई, रस्ते आणि रेल्वे प्रवास आणि हॉटेल निवासाचे एकत्रित असे स्मार्ट तिकीट देण्यात येणार आहे, तर पर्यटन स्थळी सुरक्षेसाठी विशेष पोलीस दलाची स्थापना करण्यात येणार आहे.विदर्भ, कोकण आणि कोल्हापूर भागातील खाद्यपदार्थ, तसेच मुंबईच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे मार्केटिंग केले जाणार असून, त्यासाठी विविध महोत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटन पोलीस हे सुरक्षेशिवाय पर्यटकांना परिसरातील कायदा, रूढी, संस्कृती व आकर्षण याबद्दलची माहिती देतील. स्थानिक रहिवाशांनी पर्यटनस्नेही कसे राहावे, यासाठी प्रशिक्षणही देतील. राज्यातील निवडक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील. किल्ल्यांजवळ किंवा लहान किल्ल्यांना जोडणाऱ्या मार्गावर बलून सफारी सुरू करण्यात येतील. दुर्ग परिक्रमेसह सीप्लेन सेवा देण्यात येणार आहे.वैद्यकीय पर्यटनमहाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन परिषदेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, वैद्यकीय पर्यटनाचे प्रकल्प सुरू करण्यात येतील.विविध पॅथींद्वारे उपचाराची केंद्रे उभारणे, वेलनेस अँड स्पा, विपश्यना, ध्यानधारणा आदींचे प्रकल्प उभारण्यात येतील. शैक्षणिक पर्यटनमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे पुणे, मुंबई आणि नागपुरात पर्यटनाशी संबंधित अभ्यास व संशोधनाची व्यवस्था निर्माण करेल. जगविख्यात शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी आदान-प्रदानाचे दालन उघडले जाईल. ३० हजार कोटींची गुंतवणूकपर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार असून, २०२५ पर्यंत ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट असेल. त्यातून दहा लाख रोजगार निर्मिती केली जाईल. येत्या पाच वर्षांत पर्यटनविषयक प्रकल्पांची संख्या दुप्पट व दहा वर्षांत तिप्पट केली जाईल. खासगी गुंतवणुकीतून, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पर्यटन स्थळांचा विकास करताना विविध सवलती देण्यात येणार आहेत. त्यात, ऐषाराम कर, करमणूक कर, मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर व बिगर शेती कर, चैनीच्या वस्तूंवरील कर, मूल्यवर्धित कर आदींमध्ये सवलतींचे पॅकेज दिले जाणार आहे. परवान्यांचे नूतनीकरण दरवर्षीऐवजी पाच वर्षांत एकदाच करावे लागेल. नागपूर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद या तीन विशेष पर्यटन जिल्ह्यांसाठी वेगळे पॅकेज देण्यात आले आहे.