शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आता मुंबईच्या चकरा नाही...

By admin | Updated: October 30, 2014 00:51 IST

राज्य सरकारशी संबंधित कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत जाऊनही मुख्यमंत्री भेटतीलच याची खात्री नव्हती. गडचिरोली, मेघळाटसारख्या दुर्गम

विदर्भवासीयांच्या आशा पल्लवीत : नागपुरातच सुटणार प्रश्ननागपूर : राज्य सरकारशी संबंधित कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत जाऊनही मुख्यमंत्री भेटतीलच याची खात्री नव्हती. गडचिरोली, मेघळाटसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना तर मुंबईला जाणे अधिकच गैरसोयीचे होते. आता मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळे या सर्व अडचणी दूर होतील, विदर्भातील नागरिकांचे प्रश्न येथे नागपुरातच सुटतील, असा विश्वास विदर्भवासीयांना वाटत आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचे शासन दरबारी अनेक विषय प्रलंबित असतात. ते विषय निकाली काढण्यासाठी त्यांना बऱ्याच चकरा माराव्या लागतात. अनेकांची अक्षरश: दमछाक होते तर अनेकजण निराश होऊन विषय सोडून देतात. आता मात्र नागपूरचा मुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यांनी वेळोवेळी विधानसभेत विदर्भाच्या अनुशेषावर आवाज उठविला. विदर्भावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. रस्ते, वीज, पूल यासाह पायाभूत सुविधा देण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली. विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील प्रश्नांना त्यांनी हात घातला. आता त्यांच्याच हाती राज्याची सूत्रे आल्यामुळे विदर्भावर होणारा प्रशासकीय अन्याय थांबेल, नागरिकांची कामे होतील, विकासाला चालना मिळेल, अशी वैदर्भीयांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)नागपूरच्या घरीही वाढणार वर्दळफडणवीस २७६, त्रिकोणी पार्क येथील घरी असले की त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी असायची. आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे यायचे. लोक येताना विनंती अर्ज, निवेदने घेऊन यायचे. त्यांना सकारात्मक आश्वासन मिळायचे. त्या सर्वच आश्वासनांची पूर्ती व्हायचीच असे नाही. कारण ते विरोधी पक्षात होते. ते निर्णय घेण्यासाठी सरकारला बाध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकत होते, पण स्वत: निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मर्यादा होत्या. आता ते स्वत: मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या गर्दीतील प्रत्येकालाच आपले काम, अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास असेल.