शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

राज्यात आता ‘आनंदी आनंद’!

By admin | Updated: June 3, 2017 05:39 IST

राज्यातील बळीराजा संपावर गेला असला, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असली आणि कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक

विशेष प्रतिनिधी/  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बळीराजा संपावर गेला असला, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असली आणि कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक असले, तरी राज्यातील जनता आनंदी राहावी, यासाठी सरकार आता स्वतंत्र आनंद विभाग स्थापन करणार असून, तशा हालचाली सुरू आहेत.भौतिक प्रगतीबरोबर मानसिक समाधान लाभणे तितकेच महत्त्वाचे असते. कोणतेही राष्ट्र असो की राज्य, संयुक्त राष्ट्र संघामार्फत त्या प्रदेशाच्या प्रगतीचे मूल्यमापन आता आनंद निर्देशांकानुसार केले जाते. नागरिकांचा आनंद हा केवळ भौतिक प्रगतीवर अवलंबून नसून त्यास सामाजिक, कौटुंबिक तसेच मानसिक आरोग्याचे परिमाण आवश्यक ठरते. याच्या माध्यमातून देशाची ओळख ही जागतिक पातळीवर अधिक आनंदी देश अशी होणे आवश्यक आहे. त्या साठीचाच एक भाग म्हणून राज्य शासन मदत व पुनर्वसन विभागांतर्गत आनंद विभाग स्थापन करणार आहे. त्या बाबतचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आज करण्यात आली. मदत व पुनर्वसन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील. सामान्य प्रशासन विभाग, वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वा प्रधान सचिव, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान; मुंबई, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान; मुंबईचे प्रत्येकी एक सदस्य असतील. आनंद विभागासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, तसेच यंत्रणेबाबतचा आकृतिबंद ही समिती निश्चित करेल. या विभागासाठी लागणारा निधी आणि क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा या बाबत आवश्यक त्या शिफारशीदेखील समिती करेल. समिती तिच्या पहिल्या बैठकीपासून तीन महिन्यांच्या आत अहवाल देईल. ‘आनंद’ कसा मोजला जातो...संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच २०१७ सालचा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार जगातील १५५ देशांमध्ये भारताचा १२२ वा क्रमांक आहे. मुळात आनंद ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची असल्याने, त्यानुसार संपूर्ण देशाचे मानांकन ठरविणे ही अभिनव संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात आनंद या संकल्पनेचे गुणांकन ठेवण्यासाठी प्रशासन, संस्थात्मक रचना आणि नागरिकांच्या सामाजिक संस्था या प्रमुख घटकांचा विचार केला जातो. या घटकांच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या आनंदाचे परिमाण मोजून देशाचा आनंद निर्देशांक (हॅपिनेस इंडेक्स) ठरविला जातो. त्यावरून, ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक मोजला जातो.