शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

आता गीत भीमायन

By admin | Updated: May 21, 2017 00:35 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित

- राहुल रनाळकर। लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित ‘गीत भीमायन’ची निर्मिती करण्यात येत आहे. गीत भीमायनमध्ये तब्बल शंभर गाण्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे प्रख्यात गायकानी गायलेली ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या गाण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. त्यातील शंभर गाणी ‘गीत भीमायन’साठी निवडण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येक प्रसंग वामनदादांनी अलगदपणे गीतांसाठी उचलेले आहेत. वामनदादांच्या गाण्यांवर पीएचडी केलेल्या डॉ. संजय मोहोड यांनी या गाण्यांसाठी संयोजन केले आहे. ‘गीत भीमायन’ची संकल्पना सुरुवातीला मांडली ती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी. या विद्यापीठाकडूनही काहीतरी व्हायलाच हवे, असा विचार पुढे आला. त्यातून ‘गीत भीमायन’ची संकल्पना समोर आली. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांना गीत भीमायनच्या निमित्ताने दिग्गज गायकांबरोबर गाण्याची मोठी संधीही निर्माण झाली.प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या ग. दि. माडगुळकरांच्या ‘गीत रामायणा’प्रमाणेच ‘गीत भीमायन’ देखील लोकप्रिय होईल, असा विश्वास डॉ. संजय मोहोड यांनी व्यक्त केला आहे.दिग्गज गायकांचे सूर‘गीत भीमायन’मधील २० गाणी आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येकी ५ गाणी सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व रवींद्र साठे यांनी गायली आहेत. तर ४ गाणी शुभा जोशी आणि १ गाणं सावनी शेंडे यांनी गायले आहे. पुढच्या २० गाण्यांचे काम सुरू आहे. त्यात हरिहरन, साधना सरगम, शौनक अभिषेकी आणि आशा भोसले यांचा सहभाग असणार आहे.अर्थपूर्ण गाण्यांचा साजएकीने राहा, असं सांगताना वामनदादा म्हणतात, ‘सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा...’ या गीतातील एक कडव आहे - ‘नगरी, सातारी, कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती आणि चांदा एकतेने येथे नांदा...’ आता ही फक्त गावांची नावे नाहीत. ही त्याकाळी रिपब्लिकन पाटीर्ची असलेली शक्तीकेंद्रं आहेत. नगरी, सातारी, कोकणी म्हणजे नगरचे दादासाहेब रुपवते, सातारचे बी. सी. कांबळे, कोकणचे आर. डी. भंडारे, मोगलाई म्हणजे औरंगाबादचे बी. एस. मोरे, अमरावतीचे रा. सू. गवई, चंद्रपूरचे बॅरिस्टर खोब्रागडे ही अशी सगळी मंडळी दोन ओळींमध्ये वामनदादांनी गीतबद्ध केली आहेत.