शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

आता गीत भीमायन

By admin | Updated: May 21, 2017 00:35 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित

- राहुल रनाळकर। लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित ‘गीत भीमायन’ची निर्मिती करण्यात येत आहे. गीत भीमायनमध्ये तब्बल शंभर गाण्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे प्रख्यात गायकानी गायलेली ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या गाण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. त्यातील शंभर गाणी ‘गीत भीमायन’साठी निवडण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येक प्रसंग वामनदादांनी अलगदपणे गीतांसाठी उचलेले आहेत. वामनदादांच्या गाण्यांवर पीएचडी केलेल्या डॉ. संजय मोहोड यांनी या गाण्यांसाठी संयोजन केले आहे. ‘गीत भीमायन’ची संकल्पना सुरुवातीला मांडली ती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी. या विद्यापीठाकडूनही काहीतरी व्हायलाच हवे, असा विचार पुढे आला. त्यातून ‘गीत भीमायन’ची संकल्पना समोर आली. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांना गीत भीमायनच्या निमित्ताने दिग्गज गायकांबरोबर गाण्याची मोठी संधीही निर्माण झाली.प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या ग. दि. माडगुळकरांच्या ‘गीत रामायणा’प्रमाणेच ‘गीत भीमायन’ देखील लोकप्रिय होईल, असा विश्वास डॉ. संजय मोहोड यांनी व्यक्त केला आहे.दिग्गज गायकांचे सूर‘गीत भीमायन’मधील २० गाणी आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येकी ५ गाणी सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व रवींद्र साठे यांनी गायली आहेत. तर ४ गाणी शुभा जोशी आणि १ गाणं सावनी शेंडे यांनी गायले आहे. पुढच्या २० गाण्यांचे काम सुरू आहे. त्यात हरिहरन, साधना सरगम, शौनक अभिषेकी आणि आशा भोसले यांचा सहभाग असणार आहे.अर्थपूर्ण गाण्यांचा साजएकीने राहा, असं सांगताना वामनदादा म्हणतात, ‘सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा...’ या गीतातील एक कडव आहे - ‘नगरी, सातारी, कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती आणि चांदा एकतेने येथे नांदा...’ आता ही फक्त गावांची नावे नाहीत. ही त्याकाळी रिपब्लिकन पाटीर्ची असलेली शक्तीकेंद्रं आहेत. नगरी, सातारी, कोकणी म्हणजे नगरचे दादासाहेब रुपवते, सातारचे बी. सी. कांबळे, कोकणचे आर. डी. भंडारे, मोगलाई म्हणजे औरंगाबादचे बी. एस. मोरे, अमरावतीचे रा. सू. गवई, चंद्रपूरचे बॅरिस्टर खोब्रागडे ही अशी सगळी मंडळी दोन ओळींमध्ये वामनदादांनी गीतबद्ध केली आहेत.