शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आता गीत भीमायन

By admin | Updated: May 21, 2017 00:35 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित

- राहुल रनाळकर। लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभाचे औचित्य साधून या महामानवाच्या जीवनावर आधारित ‘गीत भीमायन’ची निर्मिती करण्यात येत आहे. गीत भीमायनमध्ये तब्बल शंभर गाण्यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे प्रख्यात गायकानी गायलेली ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या गाण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. त्यातील शंभर गाणी ‘गीत भीमायन’साठी निवडण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येक प्रसंग वामनदादांनी अलगदपणे गीतांसाठी उचलेले आहेत. वामनदादांच्या गाण्यांवर पीएचडी केलेल्या डॉ. संजय मोहोड यांनी या गाण्यांसाठी संयोजन केले आहे. ‘गीत भीमायन’ची संकल्पना सुरुवातीला मांडली ती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी. या विद्यापीठाकडूनही काहीतरी व्हायलाच हवे, असा विचार पुढे आला. त्यातून ‘गीत भीमायन’ची संकल्पना समोर आली. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांना गीत भीमायनच्या निमित्ताने दिग्गज गायकांबरोबर गाण्याची मोठी संधीही निर्माण झाली.प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या ग. दि. माडगुळकरांच्या ‘गीत रामायणा’प्रमाणेच ‘गीत भीमायन’ देखील लोकप्रिय होईल, असा विश्वास डॉ. संजय मोहोड यांनी व्यक्त केला आहे.दिग्गज गायकांचे सूर‘गीत भीमायन’मधील २० गाणी आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येकी ५ गाणी सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व रवींद्र साठे यांनी गायली आहेत. तर ४ गाणी शुभा जोशी आणि १ गाणं सावनी शेंडे यांनी गायले आहे. पुढच्या २० गाण्यांचे काम सुरू आहे. त्यात हरिहरन, साधना सरगम, शौनक अभिषेकी आणि आशा भोसले यांचा सहभाग असणार आहे.अर्थपूर्ण गाण्यांचा साजएकीने राहा, असं सांगताना वामनदादा म्हणतात, ‘सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा...’ या गीतातील एक कडव आहे - ‘नगरी, सातारी, कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती आणि चांदा एकतेने येथे नांदा...’ आता ही फक्त गावांची नावे नाहीत. ही त्याकाळी रिपब्लिकन पाटीर्ची असलेली शक्तीकेंद्रं आहेत. नगरी, सातारी, कोकणी म्हणजे नगरचे दादासाहेब रुपवते, सातारचे बी. सी. कांबळे, कोकणचे आर. डी. भंडारे, मोगलाई म्हणजे औरंगाबादचे बी. एस. मोरे, अमरावतीचे रा. सू. गवई, चंद्रपूरचे बॅरिस्टर खोब्रागडे ही अशी सगळी मंडळी दोन ओळींमध्ये वामनदादांनी गीतबद्ध केली आहेत.