शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी

By admin | Updated: November 13, 2015 00:33 IST

दहावीनंतर नेमका कोणत्या शाखेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो.

सुहास सुपासे,  यवतमाळ दहावीनंतर नेमका कोणत्या शाखेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो. योग्यवेळी योग्य अभ्यासक्रमाला प्रवेश न घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पुढे नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी आता राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यावर्षीपासून इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय (कल चाचणी) चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभाविपणे होणे गरजेचे आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासंदर्भात बरेच विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाची स्थिती असते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन हवे असते. विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाबाबत कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीस मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळतो. राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामध्ये सुमारे ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी अंदाजे अडीच लाखांच्या घरात शिक्षक कार्यरत आहेत. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई या संस्थेतून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची एकूण संख्या ५३९ आहे. एकूण शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेता समुपदेशन करण्यासाठी पात्र असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे समुपदेशनाचा लाभ फारच थोड्या विद्यार्थ्यांना होतो. सध्या मानसशास्त्रीय कसोट्या या पेपर व पेन्सिलच्या माध्यमातून घेतल्या जातात. परंतु विद्यार्थी संख्या लक्षात घेता ही पद्धत फारशी प्रभावी नाही.विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता त्यांना या संदर्भात शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांची उपयुक्तता विचारात घेऊन याचा लाभ उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात येईल. या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करून आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. इयत्ता दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारा शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्राची माहिती देऊन जाणीव जागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याद्वारा विद्यार्थ्याच्या कलानुसार त्याला उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवेश वा मदत याबाबत शासनाची कोणतीही हमी असणार नाही तसेच कल चाचणीचा निकाल व प्रवेशप्रक्रिया यांचा कोणताही संबंध असणार नाही, असेही शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले असून केवळ विद्यार्थ्यांचा कल विद्यार्थ्यास व पालकांना अवगत व्हावा, या मर्यादित हेतूने ही मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात येणार आहे.