शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी

By admin | Updated: November 13, 2015 00:33 IST

दहावीनंतर नेमका कोणत्या शाखेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो.

सुहास सुपासे,  यवतमाळ दहावीनंतर नेमका कोणत्या शाखेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो. योग्यवेळी योग्य अभ्यासक्रमाला प्रवेश न घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पुढे नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी आता राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यावर्षीपासून इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय (कल चाचणी) चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभाविपणे होणे गरजेचे आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासंदर्भात बरेच विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाची स्थिती असते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन हवे असते. विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाबाबत कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीस मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळतो. राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामध्ये सुमारे ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी अंदाजे अडीच लाखांच्या घरात शिक्षक कार्यरत आहेत. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई या संस्थेतून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची एकूण संख्या ५३९ आहे. एकूण शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेता समुपदेशन करण्यासाठी पात्र असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे समुपदेशनाचा लाभ फारच थोड्या विद्यार्थ्यांना होतो. सध्या मानसशास्त्रीय कसोट्या या पेपर व पेन्सिलच्या माध्यमातून घेतल्या जातात. परंतु विद्यार्थी संख्या लक्षात घेता ही पद्धत फारशी प्रभावी नाही.विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता त्यांना या संदर्भात शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी मानसशास्त्रीय कसोट्यांची उपयुक्तता विचारात घेऊन याचा लाभ उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात येईल. या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करून आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. इयत्ता दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारा शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्राची माहिती देऊन जाणीव जागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याद्वारा विद्यार्थ्याच्या कलानुसार त्याला उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवेश वा मदत याबाबत शासनाची कोणतीही हमी असणार नाही तसेच कल चाचणीचा निकाल व प्रवेशप्रक्रिया यांचा कोणताही संबंध असणार नाही, असेही शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले असून केवळ विद्यार्थ्यांचा कल विद्यार्थ्यास व पालकांना अवगत व्हावा, या मर्यादित हेतूने ही मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात येणार आहे.