शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आता मिशन विधानसभा

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

लोकसभा निवडणूक आटोपली. त्यानंतर लागलीच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातही निवडणुका झाल्या. मंगळवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक शाखेची

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : वर्षभर व्यस्तनागपूर : लोकसभा निवडणूक आटोपली. त्यानंतर लागलीच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातही निवडणुका झाल्या. मंगळवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक शाखेची आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दीड महिन्यानंतर म्हणजे आॅगस्ट १५ नंतर या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून प्रशासन निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहे. मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी त्यापूर्वीपासूनच मतदार याद्या अद्ययावत करण्यापासून इतर कामांपर्यंत प्रशासन कामाला लागले होते. १० एप्रिलला निवडणुका झाल्या. १६ मे रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीची आचारसंहिता संपत नाही तोच विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आता राज्य विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ आॅगस्टनंतर केव्हाही निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.निवडणूक शाखेने निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या वेळी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ज्यांची नावे यादीतून वगळल्या गेली त्यांच्यासाठी विशेष मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्यावर आयोगाकडून पुन्हा एकदा मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर होईल. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत मतदारांना नावे नोंदवता येतील. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून यादीतील मृत, स्थानांतरित, दोन वेळा नावे अशी एकूण साडेपाच लाख नावे जिल्ह्याच्या मतदार यादीतून वगळण्यात आली होती. सध्या अशाच प्रकारची दीड लाखांवर नावे यादीत आहेत. मात्र ती थेट वगळली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुका आणि त्यामुळे लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विविध विकास कामांचाही खेळखंडोबा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सलग तीन महिने प्रशासन ठप्प होते. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली. लोकसभेप्रमाणे ती जाचक नसली तरी सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांना शासकीय बैठकीत सहभागी होता येत नव्हते. प्रशासनाकडे सरासरी दोन महिन्यांचा वेळ आहे. दरम्यान आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करावयाच्या कामांची लगीन घाई लोकप्रतिनिधींसोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली आहे.(प्रतिनिधी)