शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शवविच्छेदनासाठी आता न्यायवैद्यक विशेषज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 22:14 IST

ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा असूनही अनेकदा तज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले जायचे

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 -  ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा असूनही अनेकदा तज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले जायचे. यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण वाढायचा, शिवाय मन:स्थिती चांगली नसताना मृताच्या नातेवाइकांना दूरवरून येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागायचा. तसेच फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विशेषज्ञ राहत नसल्याने अनेकवेळा न्यायलयीन प्रक्रियेत लागणारे पुरावे लक्षात घेता ते घेताना काळजी घेतली जात नव्हती. अखेर याची दखल सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली. शवविच्छेदन होत असलेल्या प्रत्येक रुग्णालयात न्यायवैद्यकशास्त्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या २३ जिल्हा रुग्णालय व तीन सामान्य रुग्णालये असे एकूण २६ मोठ्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन केले जाते. यासाठी फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विशेषज्ञ असणे आवश्यक असते. मात्र संपूर्ण राज्यात केवळ दोनच ठिकाणी न्यायवैद्यक विशेषज्ञ आहेत. यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. विशेषज्ञ नसल्याने मृताच्या नातेवाईकांची धावपळ उडायची. न्यायालयीन प्रक्रियेतही अडचणी यायच्या. यामुळे जास्तीतजास्त न्यायवैद्यक अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर या संदर्भात नुकताच शासन निर्णय काढण्यात आला. यात अपघात वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील रुग्णालयांना मंजूर असलेल्या पदांपैकी एक पद  न्यायवैद्यक विशेषज्ञ या नावाने संबोधण्यात येण्याचे म्हटले आहे. या पदावर न्यायवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारण केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषज्ञ तातडीने उपलब्ध होत नसल्यास या विषया संबंधीचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात यावे व अशा प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर पदावर नियुक्त करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शवविच्छेदनात येणाऱ्या समस्या, मृताच्या नातेवाईकांची उडणारी तारांबळ कमी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, न्यायवैद्यकशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीकडेही विद्यार्थी वळणाची शक्यता आहे.