शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आता भाजपालाच हवी युती

By admin | Updated: January 19, 2017 03:47 IST

मुंबईतील युतीची बोलणी अद्याप अपूर्ण असल्याने ठाण्यातील युतीची बोलणीही थांबली आहेत.

अजित मांडके,

ठाणे- मुंबईतील युतीची बोलणी अद्याप अपूर्ण असल्याने ठाण्यातील युतीची बोलणीही थांबली आहेत. त्याचवेळी भाजपाने गुप्तचर यंत्रणेमार्फत केलेल्या सर्व्हेत एकटे लढल्यास ठाण्यात पक्षाच्या जागा ८ वरून जास्तीत जास्त २५ पर्यंत वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, आता परस्परांविरुद्ध लढून कटुता वाढवण्यापेक्षा युती करुन लढण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. मुंबईत काही जागांवरून युतीची बोलणी अडली आहे. युती करायची तर सगळीकडे करा, असा शिवसेनेचा प्रथमपासून आग्रह आहे. त्यामुळे मुंबईतील बोलणी पुढे सरकल्यानंतरच ठाण्यातील युतीची बोलणी सुरू करण्याचा निर्णय ठाण्यातील शिवसेनेने घेतला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा युतीला विरोध असला तरी युती न झाल्यास प्रचारात परस्परांवर चिखलफेक करुन पुन्हा सत्तेकरिता एकत्र यायचे तर त्यापेक्षा कटुता टाळून अगोदरच युती करावी, असे भाजपाच्या काही बड्या नेत्यांचे मत आहे. ठाण्याचा निर्णय घेण्यासाठी यापूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर यांच्या स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र या दोघांनीही युतीस विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीकरिता अनुकूल असून त्यांच्या सूचनेवरुन काही बड्या नेत्यांनी ठाण्यातील निवडणुकीत लक्ष घातले आहे. डोंबिवलीचे आमदार तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांच्या कोर्टात युती करायची किंवा कसे याचा चेंडू पडला आहे. मध्यंतरी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री चव्हाण यांच्यात युतीबाबत गुफ्तगू झाल्याची चर्चा होती. चव्हाण व पाटील यांनी युतीला अनुकूल भूमिका घेत कटुता टाळण्याचा आग्रह धरला आहे.भाजपाचा सर्व्हे नेमके काय सांगतो?भाजपाने मुंबई आणि ठाण्यात गुप्तचर यंत्रणेमार्फत आणि खासगी यंत्रणेमार्फत सर्व्हे केल्याची माहिती आहे. या सर्व्हेच्या आधारावर भाजपाच्या ठाण्यात किती जागा वाढू शकतात, याचे चित्र पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळीपुढे मांडण्यात आले आहे. शिवसेनेबरोबर युती झाल्यास ठाण्यात भाजपाच्या २५ जागा निवडून येणार आहेत. स्वबळावर लढल्यास सध्याच्या ८ जागांमध्ये आणखी १० जागांचीच भर पडून पक्ष फारतर १८ जागांपर्यंत कशीबशी मजल मारू शकतो, असा या सर्व्हेचा निष्कर्ष आहे.