शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

आता भाजपालाच हवी युती

By admin | Updated: January 19, 2017 03:47 IST

मुंबईतील युतीची बोलणी अद्याप अपूर्ण असल्याने ठाण्यातील युतीची बोलणीही थांबली आहेत.

अजित मांडके,

ठाणे- मुंबईतील युतीची बोलणी अद्याप अपूर्ण असल्याने ठाण्यातील युतीची बोलणीही थांबली आहेत. त्याचवेळी भाजपाने गुप्तचर यंत्रणेमार्फत केलेल्या सर्व्हेत एकटे लढल्यास ठाण्यात पक्षाच्या जागा ८ वरून जास्तीत जास्त २५ पर्यंत वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, आता परस्परांविरुद्ध लढून कटुता वाढवण्यापेक्षा युती करुन लढण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. मुंबईत काही जागांवरून युतीची बोलणी अडली आहे. युती करायची तर सगळीकडे करा, असा शिवसेनेचा प्रथमपासून आग्रह आहे. त्यामुळे मुंबईतील बोलणी पुढे सरकल्यानंतरच ठाण्यातील युतीची बोलणी सुरू करण्याचा निर्णय ठाण्यातील शिवसेनेने घेतला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा युतीला विरोध असला तरी युती न झाल्यास प्रचारात परस्परांवर चिखलफेक करुन पुन्हा सत्तेकरिता एकत्र यायचे तर त्यापेक्षा कटुता टाळून अगोदरच युती करावी, असे भाजपाच्या काही बड्या नेत्यांचे मत आहे. ठाण्याचा निर्णय घेण्यासाठी यापूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर यांच्या स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र या दोघांनीही युतीस विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीकरिता अनुकूल असून त्यांच्या सूचनेवरुन काही बड्या नेत्यांनी ठाण्यातील निवडणुकीत लक्ष घातले आहे. डोंबिवलीचे आमदार तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांच्या कोर्टात युती करायची किंवा कसे याचा चेंडू पडला आहे. मध्यंतरी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री चव्हाण यांच्यात युतीबाबत गुफ्तगू झाल्याची चर्चा होती. चव्हाण व पाटील यांनी युतीला अनुकूल भूमिका घेत कटुता टाळण्याचा आग्रह धरला आहे.भाजपाचा सर्व्हे नेमके काय सांगतो?भाजपाने मुंबई आणि ठाण्यात गुप्तचर यंत्रणेमार्फत आणि खासगी यंत्रणेमार्फत सर्व्हे केल्याची माहिती आहे. या सर्व्हेच्या आधारावर भाजपाच्या ठाण्यात किती जागा वाढू शकतात, याचे चित्र पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळीपुढे मांडण्यात आले आहे. शिवसेनेबरोबर युती झाल्यास ठाण्यात भाजपाच्या २५ जागा निवडून येणार आहेत. स्वबळावर लढल्यास सध्याच्या ८ जागांमध्ये आणखी १० जागांचीच भर पडून पक्ष फारतर १८ जागांपर्यंत कशीबशी मजल मारू शकतो, असा या सर्व्हेचा निष्कर्ष आहे.