शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

चुकीच्या प्रश्नपत्रिकेवरून राज्य सरकारला नोटीस

By admin | Updated: May 21, 2015 02:02 IST

चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या सुटीतील न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी राज्य सरकार व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने ४ जानेवारी २०१५ रोजी घेतलेल्या पदव्युतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेत (पीजीएम-सीईटी) चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या सुटीतील न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी राज्य सरकार व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास नोटिसा बजावल्या आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी २२ मे रोजी होईल. ३० मार्च रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याविरुद्ध सिल्लोडच्या डॉ. माधुरी राजपूत यांनी शासनाकडे तात्काळ लेखी आक्षेप घेतला; परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे डॉ. राजपूत यांनी गुणवत्ता यादीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने राजपूत यांच्या आक्षेपांवर तातडीने वैयक्तिक सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र त्यानंतरही शासनाने डॉ. राजपूत यांचा आक्षेप अर्ज त्रोटक कारणे देऊन फेटाळला. त्यास राजपूत यांनी आव्हान दिले. पीजीएम-सीईटी २०१५ परीक्षेत १७ प्रश्नांमध्ये ४ पैकी २ पर्याय अचूक उत्तरांचे देऊन विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना १७ गुण बहाल करावेत, त्याचप्रमाणे दोषी पेपरसेटर, अधिकारी तसेच वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ समितीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली होती.संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालिकेविरुद्ध राज्यातील १२ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. ३०० पैकी ४४ प्रश्नांवर वैद्यकीय विषय तज्ज्ञ समिती, वर्धा व पुणे यांनी आक्षेपांचे निर्णय नोंदविले. संचालनालयाने त्याची दखल घेऊन वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ समितीला अहवाल देण्यास सांगितले. समितीने १३ प्रश्न चुकीचे असल्याचा अहवाल नोंदविला. त्या आधारे संचालनालयाने सर्व विद्यार्थ्यांना १३ गुण दिले. तर परीक्षार्थींनी संचालनालयाकडे नोंदविलेल्या आक्षेपांवर समाधान न झाल्याचे कळविले. त्यामुळे संचालनालयाने पुन्हा पुण्यातील आर्मड फोर्स मेडिकल कॉलेजच्या समितीकडून अहवाल मागविला. त्यांनी केवळ १३ प्रश्न चुकीचे नसून २३ प्रश्न चुकीचे असल्याचा अहवाल दिला. त्या आधारे संचालनालयाने सर्व परीक्षार्थींना २६ गुण दिले होते.