शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

फक्त विस्तार, फेरबदल नाही

By admin | Updated: November 23, 2015 02:15 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबरअखेर होणार असून, त्यात कोणत्याही विद्यमान मंत्र्यास डच्चू मिळण्याची शक्यता नाही. मात्र, कामगिरी सुधारण्याबाबत काही भाजपा मंत्र्यांना तंबी मात्र दिली जाऊ शकते.

यदु जोशी, मुंबईराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबरअखेर होणार असून, त्यात कोणत्याही विद्यमान मंत्र्यास डच्चू मिळण्याची शक्यता नाही. मात्र, कामगिरी सुधारण्याबाबत काही भाजपा मंत्र्यांना तंबी मात्र दिली जाऊ शकते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या वर्षी ३१ आॅक्टोबरला शपथ घेतली होती. त्यावेळी पाच जणांना कॅबिनेटमंत्रिपदाची तर पाच जणांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर ५ डिसेंबरला शिवसेना सत्तेत सहभागी झाली आणि भाजपाच्या काही जणांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.मंत्रिमंडळाच्या विस्तारात काही मंत्र्यांना यावेळी डच्चू मिळणार असल्याच्या बातम्या येत असल्या, तरी भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, एक वर्ष वा त्याहून कमी असा कार्यकाळ मिळालेल्या मंत्र्यांची कामगिरी चांगली-वाईट असल्याचे ठरविणे आणि त्यावरून त्यांना वगळणे अन्यायकारक ठरेल, असा पक्षामध्ये सूर आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘३० नोव्हेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा निश्चितपणे विस्तार होईल. हा विस्तार असेल फेरबदलाबाबत. म्हणजे कोणाला वगळण्याबाबत कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. जाणकारांच्या मते, सध्या जे मंत्री आहेत, त्यांना त्यांच्या आधीच्या कामगिरीवरूनच मंत्रिपद मिळाले, असे नाही. तसे असते तर अंबरीशराजे आत्राम यांच्यासारखे नवखे आमदार राज्यमंत्री झालेच नसते. प्रादेशिक, सामाजिक संतुलन असे अनेक फॅक्टर त्यात असतात. मुंबईच्या विद्या ठाकूर यांना राज्यमंत्रिपद मिळाले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, जनसंघ, भाजपात त्यांच्या घराण्याचे योगदान हा इतरत्र माहिती नसलेला फॅक्टर त्यांच्या मदतीला आला होता. विस्तारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत प्रमाण मानले जाईल. मात्र, बिहारमधील निवडणुकीत भाजपाचे पानिपत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा पक्षांतर्गत बुजुर्गांच्या टीकेचे लक्ष्य ठरले, तेव्हा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्यांच्यासाठी संकटमोचक म्हणून समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, विस्तारात गडकरींच्या मतालाही महत्त्व असेल. असे म्हटले जाते की, विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठे फेरबदल केले जाणार नाहीत. मात्र, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशा मंत्र्यांकडील काही खाती नव्या मंत्र्यांना दिली जाऊ शकतात. अनेकांना बुचकळ्यात पाडणारे एखादे नाव थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडूनही येते आणि ते मान्य करावेच लागते, असा यापूर्वीचा अनुभव आहे. राज्यसभेवर कोणाला पाठवायचे, याबाबत राज्य भाजपात खल सुरू असताना, अमित शहांनी अचानक दलित चेहरा शोधण्याचे आदेश दिले आणि तो शोधता-शोधता नेत्यांची पुरेवाट झाली व अमर साबळे यांना खासदारकीची लॉटरी लागली, हा किस्सा सर्वश्रुत आहे. सेनेकडून खोपकर, पाटीलशिवसेनेकडून जालना जिल्ह्यातील अर्जुन खोतकर आणि जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील या दोन निष्ठावंत शिवसैनिकांना संधी मिळेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ नेत्यांशी केलेल्या चर्चेतही हीच दोन नावे समोर आली होती. दोघेही विधानसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेत सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, डॉ.दीपक सावंत हे चार कॅबिनेटमंत्री विधान परिषदेचे सदस्य आहेत.