शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

सरसकट कर्जमाफी नाहीच : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 05:59 IST

अडचणीत आलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी देण्यावर राज्य सरकार ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अडचणीत आलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी देण्यावर राज्य सरकार ठाम असून सरसकट कर्जमाफी देता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन पात्रता निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत राज्यातील नागरी प्रकल्पांचा आढावा सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती दिली. कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यात आंदोलन सुरू असून सरसकट कर्जमाफीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध शेतकरी संघटना आणि सामाजिक संस्था संपात उतरल्या आहेत.यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, २००८ साली देण्यात आलेल्या कर्जमाफीत अनियमितता असल्याचा ठपका महालेखापालांनी ठेवला होता. नव्या कर्जमाफीत अशी गडबड होऊ नये आणि योग्य व्यक्तीला कर्जमाफी मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, कोणाला त्यातून वगळावे, कर्जमाफी कशी द्यावी यासाठी सर्वच पक्ष, संघटना आणि व्यक्तींशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खऱ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला आम्ही सदैव तयार आहोत. आमच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्यांनाही चर्चेचे दरवाजे उघडे आहेत. मात्र, केवळ राजकीय गणिते डोक्यात ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा शक्य नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. >आघाडीच्या चुकीच्या धोरणांचा फटका- व्यंकय्या नायडू उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये त्या राज्य सरकारांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने ही कर्जमाफी दिलेली नाही. या राज्यांच्या अर्थव्यवस्थेला असा निर्णय पेलवणारा आहे. त्यामुळे त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पंधरा वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेस आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. >सोमवारच्या बंदमधील प्रत्येक घटनेची तपशीलवार माहिती माझ्याकडे आहे. आंदोलनादरम्यान शेतमालाचे नुकसान करणारे, जाळपोळ व दगडफेक करणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते. यात शेतकरी कुठेच नव्हता. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राज्यातील जनतेला पक्के ठाऊक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.