शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांवर खुनाचा नव्हे, बेकायदा अटकेचा ठपका

By admin | Updated: November 23, 2015 02:09 IST

अ‍ॅग्नेल्लो वल्दारिस (२४) याचा तुरुंगात असताना खून आणि लैंगिक छळ झाला नव्हता, असे केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) म्हटले.

डिप्पी वांकाणी,  मुंबईअ‍ॅग्नेल्लो वल्दारिस (२४) याचा तुरुंगात असताना खून आणि लैंगिक छळ झाला नव्हता, असे केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) म्हटले. १५ एप्रिल २०१४ रोजी वल्दारिससह तीन जणांना रेल्वे पोलिसांनी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते. वल्दारिसच्या वडिलांनी अ‍ॅग्नेल्लोचा पोलिसांनी लैंगिक छळ करून त्याला धावत्या रेल्वेखाली फेकून दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. अ‍ॅग्नेल्लोचा खून आणि त्या आधी लैंगिक छळ झाल्याचा आरोप चौकशीनंतर फेटाळला आहे. या प्रकरणात आरोपी ठरलेल्या १० रेल्वे पोलिसांना या अहवालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रेल्वे पोलिसांनी आपल्या दप्तरात वल्दारिसला अटक केल्याच्या वेळेची जी नोंद केली आहे, त्या आधी त्याला त्यांनी ताब्यात घेतले होते. आता सीबीआयने या प्रकरणात या दहा रेल्वे पोलिसांवर खटला भरण्यात यावा, अशी महाराष्ट्र सरकारकडे मंजुरी मागितली आहे. सीबीआयने त्यांचा अहवाल १७ नोव्हेंबर रोजी आमच्याकडे सादर केला असून, त्या दहा पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवावा, असे म्हटले, अशी माहिती भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात लैंगिक छळ आणि खुनाची शक्यता फेटाळली आहे. पोलीस या प्रकरणात कोणत्याही प्रकारे दोषी आढळले आहेत का, असे विचारता, हा अधिकारी म्हणाला की, ‘पोलिसांनी वल्दारिसला अटक केल्याची जी वेळ दप्तरात नोंद केली आहे, त्याच्या आधी १० तास त्यांनी त्याला ताब्यात घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले. ‘यावरून त्याला बेकायदेशीरपणे स्थानबद्ध केले होते, एवढेच दिसते. आम्ही हा सीबीआयचा अहवाल पुढे पाठविणार असून, खटला चालविण्याची परवानगी देण्याचा अधिकार सरकारला आहे.’‘अ‍ॅग्नेल्लो वल्दारिसला आम्ही १८ एप्रिल २०१४ रोजी घेऊन जात असताना, त्याने पळून जाण्याच्या उद्देशाने रेल्वेच्या रुळांवर उडी मारली, परंतु तो रेल्वेखाली चिरडला गेला, असा दावा पोलिसांनी केला होता. त्याच्या वडिलांनी मात्र पोलिसांनी त्याचा लैंगिक छळ करून त्याला धावत्या रेल्वेखाली फेकले, असा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) आणि नंतर पोलीस पुरावे ‘तयार’ करीत असल्याचे सांगून प्रकरण १७ जून रोजी सीबीआयकडे सोपविले होते.