शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीपूर्वीच ‘सागर’ बुडाली

By admin | Updated: May 14, 2017 03:05 IST

बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती. तीन ते चार वर्षांपूर्वी व्याजदर कमी करून त्यांनी गुंतवणूकदारांना त्याची हलकीशी कल्पनाही दिली होती. मात्र, जास्त व्याजदराच्या लोभात सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये निर्माण झालेली आर्थिक कोंडी गुंतवणूकदारांच्या लक्षातच आली नाही. केवळ नोटाबंदीचा आधार घेऊन सागर इन्व्हेस्टमेंटने कंपनी बुडाल्याचे जाहीर केले आहे. २८ वर्षांपासून जास्त व्याजदर देणारी आणि शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे फिरवणारी सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी बुडीत निघाली आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकले. गुंतवणूकदारांचेच पैसे अन्य गुंतवणूकदारांचे व्याज देण्यासाठी वापरण्यात येत होते. व्याजदर जास्त मिळत असल्याने सर्वसामान्यांनीही दोन लाखांपासून २० लाखांपर्यंतची गुंतवणूक केली होती. त्यात शहरातील काही बड्या उद्योजकांनीही जास्त व्याजासाठी २५ लाखांपासून ते १ कोटीपर्यंतची गुंतवणूक केली होती. २८ वर्षे न चुकता व्याज मिळत असल्याने सागर इन्व्हेस्टमेंटच्या अनेक शाखा पुणे, ठाणे, डोंबिवली येथे सुरू झाल्या. आलेलीच रक्कम व्याजाच्या स्वरूपात फिरवण्याचा हा व्यवसाय कुठेतरी अडचणीत येणार, याची कल्पना सागर इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख श्रीराम समुद्र, अनघा समुद्र, भक्ती समुद्र, सुहास समुद्र आणि सुनरता समुद्र यांना होती. मात्र, जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवण्याचा निर्णय समुद्र कुटुंबीयांनी घेतला होता. अखेर, या साखळीचा शेवट नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात झाला. नोटाबंदीमुळे कोट्यवधी रुपये वाया गेल्यानेच कंपनीला उतरती कळा लागली, अशी अफवा शहरात पसरवण्यात आली. मात्र, ही कंपनी नोटाबंदीनिमित्ताने बुडाली, हे दर्शवण्याचा प्रयत्न समुद्र कुटुंबीयांनी केला. नोटाबंदीच्या काळात सागर इन्व्हेस्टमेंटकडे कोट्यवधी रुपये पडून होते, असा अंदाज जरी काढला तरी त्याचे संचालक ही रक्कम आपल्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात वाटून जुन्या नोटा बाहेर काढू शकत होते. गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात आलेली रक्कम गुंतवणूकदार आपल्या जबाबदारीवर बँकेत भरणेही शक्य होते. मात्र, नोटाबंदीच्या काळातही सागर इन्व्हेस्टमेंटकडे जुन्या नोटा नव्हत्या, हे उघड होते.व्याजदर हळूहळू कमी करत गेलेमुळात ही व्याज देण्याची साखळी तीन ते चार वर्षांपूर्वीच कमकुवत झाली होती. त्यामुळेच आधी १८ टक्के व्याज देणाऱ्या सागर कंपनीने नंतर हाच व्याजदर १५ आणि शेवटी १२ टक्के केला. यावरून, कंपनी बुडत असल्याचा अंदाज आधीच आला होता. मात्र, जास्त व्याजाच्या मोहात अनेकांचे पैसे या कंपनीत अडकले आहेत.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपल्याला न्याय मिळावा यासाठी सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांनी मध्यंतरी आमदार किसन कथोरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांनी या गुंतवणूदारांचे म्हणणे ऐकून घेतले. कंपनीच्या संचालकांची मालमत्ता विकून आम्हाला पैसे मिळावेत अशी मागणी या गुंतवणूकदारांनी यावेळी कथोरे यांच्याकडे केली होती. मात्र तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे ते म्हणाले.