शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

महिलांवरील अत्याचाराच्या आढाव्यासाठी ‘नोडल एजन्सी’

By admin | Updated: May 28, 2016 01:35 IST

राज्यातील तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढत असताना त्याला प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा लेखाजोखा आता दस्तरखुद्द गृह विभागाच्या

- जमीर काझी, मुंबई

राज्यातील तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढत असताना त्याला प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा लेखाजोखा आता दस्तरखुद्द गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडून घेतला जाणार आहे. महिलांवरील गुन्हे व समस्यांच्या निराकरणाची माहिती घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क यंत्रणेची(नोडल एजन्सी) राज्य सरकारने स्थापना केली आहे. दहा सदस्यांच्या समितीमध्ये विविध विभागांचे प्रधान सचिव व आयपीएस अधिकाऱ्यांच्या समावेश असणार असून, दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. त्यांची माहिती उच्च न्यायालयालाही कळवावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात महिला व तरुणींवर अत्याचार, हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याबाबत सर्व स्तरावर होत असलेल्या टीकेमुळे पाच वर्षांपूर्वी कॉँग्रेस आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीने शिफारशी सुचवून विविध विभागांमार्फत अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. त्याबाबत शासनाकडून टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जात आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी गृह विभागाकडून एक स्वतंत्र ‘नोडल एजन्सी’ नेमण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्यास गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली आहे. महिला अत्याचार प्रतिबंध व सायबर गुन्हे विभागाचे विशेष महानिरीक्षक ब्रिजेश सिंह त्यांचे सदस्य सचिव असतील. त्याशिवाय महिला व बालकल्याण, विधि व न्याय, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, सार्वजनिक आरोग्य, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य शाखेचे सरकारी अभियोक्ता तसेच महिलांशी संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे. दर तीन महिन्यांतून एकदा ‘नोडल एजन्सी’कडून बैठक घेऊन राज्यातील महिलांवरील अत्याचार, समस्या आणि त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल, त्याची माहिती उच्च न्यायालयाला सादर करावी लागणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, कार्यवाहीची माहिती ‘नोडल एजन्सी’कडून घेऊन त्याबाबत योग्य त्या सूचना केल्या जातील. त्याची कार्यवाही करणे अधिकाऱ्यांवर बंधनकारक असणार आहे. - के.पी. बक्षी (अपर मुख्य सचिव, गृह)