शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दुष्काळी भागात बांधकामासाठी पाणी नको - उच्च न्यायालय

By admin | Updated: May 25, 2016 02:55 IST

राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका. तसेच धरणे व विहिरीतील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी

मुंबई : राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका. तसेच धरणे व विहिरीतील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. हा निर्णय केवळ दुष्काळी भागांसाठीच असल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नैसर्गिक जलस्रोत राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास खासगी धरणातील पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने सरकारला दिले.मराठवाड्यासह संपूर्ण राज्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शाही स्नान व आयपीएल सामान्यांसाठी पाण्याची नासाडी करू नये, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. बी. आर. गवई व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. ‘पाण्यासारखी नैसर्गिक साधने ही कोणा एकाची खासगी संपत्ती असू शकत नाही. ती राष्ट्रीय संपत्ती आहे,’ असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आवश्यकता पडल्यास खासगी धरणातील पाणी नागरिकांना उपलब्ध करण्याची सूचना केली. तसेच खंडपीठाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात येईल, अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्यात येणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले. (प्रतिनिधी) जलनियामक प्राधिकरणाची दोन आठवड्यांत नियुक्ती कराराज्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यातच पाण्याचे नियोजन करणाऱ्या जलनियामक प्राधिकरणाची मुदत संपली आहे. याची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत जलनियामक प्राधिकरणाची नियुक्ती करा अन्यथा अस्तित्वात असलेल्या प्राधिकरणाला काही आठवडे मुदतवाढ द्या, असा आदेश राज्य सरकारला दिला. तर जलनियामक प्राधिकरणाला राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या पातळीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.