शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागात बांधकामासाठी पाणी नको - उच्च न्यायालय

By admin | Updated: May 25, 2016 02:55 IST

राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका. तसेच धरणे व विहिरीतील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी

मुंबई : राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका. तसेच धरणे व विहिरीतील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. हा निर्णय केवळ दुष्काळी भागांसाठीच असल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नैसर्गिक जलस्रोत राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास खासगी धरणातील पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने सरकारला दिले.मराठवाड्यासह संपूर्ण राज्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शाही स्नान व आयपीएल सामान्यांसाठी पाण्याची नासाडी करू नये, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. बी. आर. गवई व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. ‘पाण्यासारखी नैसर्गिक साधने ही कोणा एकाची खासगी संपत्ती असू शकत नाही. ती राष्ट्रीय संपत्ती आहे,’ असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आवश्यकता पडल्यास खासगी धरणातील पाणी नागरिकांना उपलब्ध करण्याची सूचना केली. तसेच खंडपीठाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात येईल, अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्यात येणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले. (प्रतिनिधी) जलनियामक प्राधिकरणाची दोन आठवड्यांत नियुक्ती कराराज्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यातच पाण्याचे नियोजन करणाऱ्या जलनियामक प्राधिकरणाची मुदत संपली आहे. याची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत जलनियामक प्राधिकरणाची नियुक्ती करा अन्यथा अस्तित्वात असलेल्या प्राधिकरणाला काही आठवडे मुदतवाढ द्या, असा आदेश राज्य सरकारला दिला. तर जलनियामक प्राधिकरणाला राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या पातळीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.