शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

आता शेतक-यांना भारनियमनाचे ‘नो टेंशन’!

By admin | Updated: December 29, 2014 00:42 IST

पाच वर्षांत पाच लाख सौर उज्रेवर आधारीत कृषी पंप बसविणार, शेतक-यांचा होणार सोशो- एकॉनॉमिक सर्वे.

विवेक चांदूरकर /अकोला: विद्युत पुरवठा नाही, सततचे भारनियमन तसेच रोहित्र जळाल्यामुळे शेतकरी आता सिंचनापासून वंचित राहणार नाहीत. शासनाने सौर उज्रेवर आधारीत कृषीपंप राज्यभरातील शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरीवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पाच वर्षांत पाच लाख शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. देशात सध्या प्रामुख्याने कोळसा, पाणी व अणू यापासून उर्जा निर्मिती केली जाते. मात्र, कोळसा व पाण्याची उपलब्धता र्मयादीत असल्यामुळे उर्जा निर्मितीवर र्मयादा येत आहे. त्यामुळे शासनाने आता सौर उज्रेवर भर देण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतीत तंत्रज्ञान आणण्याचे आटोकाट प्रयत्न देशभर होत असताना राज्य शासनाने महाराष्ट्राची शेती तंत्रज्ञानयुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार शेतातील सिंचनाचे तंत्रज्ञानावर आधारीत रूपांतर करण्याकरिता विहिरीवरील तसेच विंधन विहिरीवरील पंप यापुढे सौर उज्रेवर चालविण्यात येणार आहे. त्याकरिता तालुकानिहाय शेतकर्‍यांचा समूह (क्लस्टर) बनविण्यात येणार आहे. एकाच भागात ओलित व कोरडवाहू शेती असते. त्यामुळे यानुसार शेतकर्‍यांचे क्लस्टर तयार करून त्यानुसार सौर उज्रेवरील पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. शेतात पंप लावून सुरू होईपर्यंतची जबाबदारी शासनाचीच राहणार आहे. सदर पंप खरेदी करून शेतकर्‍यांच्या शेतात विहिरीवर लावून देण्यात येणार आहे. तोपर्यंतचा सर्व खर्च शासन करणार असून, शेतकर्‍यांकडून नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे. कृषी पंप लावण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांवर सोपविण्यात येणार आहे.

*वीज पोहोचली नसलेल्या भागातही सौर उज्रेवरीलच वीज ज्या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. त्या ठिकाणी विद्युत खांब व तारेचा खर्च करण्याऐवजी हाच पैसा सौर उज्रेवर आधारीत विद्युत उपकरणांवर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये सौर उज्रेवर आधारीत विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.

*शेतकर्‍यांचा सोशो, एकॉनॉमिक सर्वे होणार महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पाण्याची यासोबतच प्रत्येक गावात शेतकर्‍यांना सिंचनाची पिकनिहाय पाण्याची मागणीही लक्षात घेतली जाणार आहे. यामध्ये कोणत्या शेतकर्‍याकडे किती शेती आहे, तो कोणते पीक घेतो व त्याला किती पाण्याची गरज आहे. त्याचा पुरवठा कोठून होवू शकतो, याची माहितीही घेण्यात येणार आहे.

*तालुका स्तरावर सव्र्हीस सेंटर राहणार शेतात सौर उज्रेवर आधारीत कृषी पंप बसविण्यात आल्यानंतर त्यामध्ये बिघाड आला तर शेतकर्‍यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण तालुकास्तरावर सव्र्हीस सेंटर उघडण्यात येणार आहे. कृषी पंपात बिघाड आला तर या सेंटरमधील कर्मचारी शेतात जावून पंप दुरूस्त करून देणार आहेत.