शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

आता शेतक-यांना भारनियमनाचे ‘नो टेंशन’!

By admin | Updated: December 29, 2014 00:42 IST

पाच वर्षांत पाच लाख सौर उज्रेवर आधारीत कृषी पंप बसविणार, शेतक-यांचा होणार सोशो- एकॉनॉमिक सर्वे.

विवेक चांदूरकर /अकोला: विद्युत पुरवठा नाही, सततचे भारनियमन तसेच रोहित्र जळाल्यामुळे शेतकरी आता सिंचनापासून वंचित राहणार नाहीत. शासनाने सौर उज्रेवर आधारीत कृषीपंप राज्यभरातील शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरीवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पाच वर्षांत पाच लाख शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. देशात सध्या प्रामुख्याने कोळसा, पाणी व अणू यापासून उर्जा निर्मिती केली जाते. मात्र, कोळसा व पाण्याची उपलब्धता र्मयादीत असल्यामुळे उर्जा निर्मितीवर र्मयादा येत आहे. त्यामुळे शासनाने आता सौर उज्रेवर भर देण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतीत तंत्रज्ञान आणण्याचे आटोकाट प्रयत्न देशभर होत असताना राज्य शासनाने महाराष्ट्राची शेती तंत्रज्ञानयुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार शेतातील सिंचनाचे तंत्रज्ञानावर आधारीत रूपांतर करण्याकरिता विहिरीवरील तसेच विंधन विहिरीवरील पंप यापुढे सौर उज्रेवर चालविण्यात येणार आहे. त्याकरिता तालुकानिहाय शेतकर्‍यांचा समूह (क्लस्टर) बनविण्यात येणार आहे. एकाच भागात ओलित व कोरडवाहू शेती असते. त्यामुळे यानुसार शेतकर्‍यांचे क्लस्टर तयार करून त्यानुसार सौर उज्रेवरील पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. शेतात पंप लावून सुरू होईपर्यंतची जबाबदारी शासनाचीच राहणार आहे. सदर पंप खरेदी करून शेतकर्‍यांच्या शेतात विहिरीवर लावून देण्यात येणार आहे. तोपर्यंतचा सर्व खर्च शासन करणार असून, शेतकर्‍यांकडून नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे. कृषी पंप लावण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांवर सोपविण्यात येणार आहे.

*वीज पोहोचली नसलेल्या भागातही सौर उज्रेवरीलच वीज ज्या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. त्या ठिकाणी विद्युत खांब व तारेचा खर्च करण्याऐवजी हाच पैसा सौर उज्रेवर आधारीत विद्युत उपकरणांवर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये सौर उज्रेवर आधारीत विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.

*शेतकर्‍यांचा सोशो, एकॉनॉमिक सर्वे होणार महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पाण्याची यासोबतच प्रत्येक गावात शेतकर्‍यांना सिंचनाची पिकनिहाय पाण्याची मागणीही लक्षात घेतली जाणार आहे. यामध्ये कोणत्या शेतकर्‍याकडे किती शेती आहे, तो कोणते पीक घेतो व त्याला किती पाण्याची गरज आहे. त्याचा पुरवठा कोठून होवू शकतो, याची माहितीही घेण्यात येणार आहे.

*तालुका स्तरावर सव्र्हीस सेंटर राहणार शेतात सौर उज्रेवर आधारीत कृषी पंप बसविण्यात आल्यानंतर त्यामध्ये बिघाड आला तर शेतकर्‍यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण तालुकास्तरावर सव्र्हीस सेंटर उघडण्यात येणार आहे. कृषी पंपात बिघाड आला तर या सेंटरमधील कर्मचारी शेतात जावून पंप दुरूस्त करून देणार आहेत.