शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे युती नाही!

By admin | Updated: February 5, 2017 00:44 IST

केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे

मुंबई : केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे सेना संपवू म्हणविणाऱ्यांना कायमचे हद्दपार करीत मुंबई महापालिकेवर एकट्याने भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. गिरगावातील चिराबाझार येथील सभेने सेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्र कारभारावर कडाडून हल्ला चढविला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मुंबई महापालिकेचा कारभार सर्वाधिक पारदर्शी असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे,त्यामुळे आमच्या कारभारावर टीका करणारे तोंडावर आपटले आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे नाव न घेता हाणला. ते म्हणाले,‘ महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आमच्यात मनभेद आहेत. माझे त्यांना खुले आवाहन आहे की, मनभेद की मतभेद ते समोरासमोर येऊन लोकांना सांगा. अमित शहा तुम्ही हिंदुत्व सोडलंत, राष्ट्रीयत्व सोडले. पण आम्ही सोडणार नाही. म्हणून आमचे मतभेद आहेत. कधी म्हणतात फ्रेंडली, तर कधी महाभारतातील कौरव पांडवाची लढाई आहे, असे म्हणतात. महाभारत खेळायचे असल्यास पहिल्याद श्रीखंडी, पाखंडी ही पात्रे समोर येऊ देत मग त्यांना हिसका दाखवू.’ (प्रतिनिधी)निर्णय का नाही?महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे.