शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

यापुढे युती नाही!

By admin | Updated: February 5, 2017 00:44 IST

केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे

मुंबई : केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे सेना संपवू म्हणविणाऱ्यांना कायमचे हद्दपार करीत मुंबई महापालिकेवर एकट्याने भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. गिरगावातील चिराबाझार येथील सभेने सेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्र कारभारावर कडाडून हल्ला चढविला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मुंबई महापालिकेचा कारभार सर्वाधिक पारदर्शी असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे,त्यामुळे आमच्या कारभारावर टीका करणारे तोंडावर आपटले आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे नाव न घेता हाणला. ते म्हणाले,‘ महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आमच्यात मनभेद आहेत. माझे त्यांना खुले आवाहन आहे की, मनभेद की मतभेद ते समोरासमोर येऊन लोकांना सांगा. अमित शहा तुम्ही हिंदुत्व सोडलंत, राष्ट्रीयत्व सोडले. पण आम्ही सोडणार नाही. म्हणून आमचे मतभेद आहेत. कधी म्हणतात फ्रेंडली, तर कधी महाभारतातील कौरव पांडवाची लढाई आहे, असे म्हणतात. महाभारत खेळायचे असल्यास पहिल्याद श्रीखंडी, पाखंडी ही पात्रे समोर येऊ देत मग त्यांना हिसका दाखवू.’ (प्रतिनिधी)निर्णय का नाही?महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे.