शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग नको : प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: July 22, 2016 01:00 IST

कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे

पुणे : कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे, विशिष्ट जातीवर टीका करणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने याबाबत भाष्य करणे गरजेचे आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.कोपर्डी (ता. कर्जत) येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आंबेडकर निघाले होते. मात्र शिरूर येथे ते पोहोचले असतानाच नगर पोलिसांनी मनाई करणारा हुकूम बजावला. त्याचे कारण विचारले असता पोलिसांनी तुमच्या भेटीला विरोध करण्याचा निर्णय कोपर्डी गावात झाला असल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे पुण्यात येऊन आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग देणे योग्य नाही. सोशल मीडियावरून वारंवार तसे केले जात आहे. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठीच आपण तिथे जात होतो, मात्र पोलिसांनी मनाई केली. आंबेडकर म्हणाले, ‘‘भाजपाच्या पदाधिकाऱ्याने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याविषयी काढलेले उद््गार हा भाजपाच्या धोरणाचाच एक भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरून कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे निश्चित केले जात असून, त्यानुसारच हे सुरू आहे. असे कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे त्यांच्यात ठरले असल्याचे दिसते आहे. गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार झाले. तिथे असलेल्या गोरक्षा समितीला संघाचे पाठबळ आहे. मायावतींवर झालेली टीकाही त्यांच्या धोरणाचाच भाग असावा. ’’