शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग नको : प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: July 22, 2016 01:00 IST

कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे

पुणे : कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे, विशिष्ट जातीवर टीका करणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने याबाबत भाष्य करणे गरजेचे आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.कोपर्डी (ता. कर्जत) येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आंबेडकर निघाले होते. मात्र शिरूर येथे ते पोहोचले असतानाच नगर पोलिसांनी मनाई करणारा हुकूम बजावला. त्याचे कारण विचारले असता पोलिसांनी तुमच्या भेटीला विरोध करण्याचा निर्णय कोपर्डी गावात झाला असल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे पुण्यात येऊन आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग देणे योग्य नाही. सोशल मीडियावरून वारंवार तसे केले जात आहे. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठीच आपण तिथे जात होतो, मात्र पोलिसांनी मनाई केली. आंबेडकर म्हणाले, ‘‘भाजपाच्या पदाधिकाऱ्याने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याविषयी काढलेले उद््गार हा भाजपाच्या धोरणाचाच एक भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरून कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे निश्चित केले जात असून, त्यानुसारच हे सुरू आहे. असे कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे त्यांच्यात ठरले असल्याचे दिसते आहे. गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार झाले. तिथे असलेल्या गोरक्षा समितीला संघाचे पाठबळ आहे. मायावतींवर झालेली टीकाही त्यांच्या धोरणाचाच भाग असावा. ’’