सलीम सय्यद, लातूरदेशभरात दिवाळीची धूम अन् फटाक्यांची आतषबाजी होताना पालावर ना फटाके, ना कपडे, ना मिठाई़ लाकडे शोधून आणल्याशिवाय चूलही पेटत नाही, असे चित्र असताना दिवाळी कशी साजरी करावी, अशी भावना अहमदपूर परिसरातील एका कुटुंबियांनी व्यक्त केली़ श्रीमंत मध्यमवर्गीय लोक एकीकडे दिवाळी सणानिमित्त फटाके, कपडे, मिठाई खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत असल्याचे चित्र आहे़ मात्र शहरात असलेल्या भटक्या जमातीच्या कुटुंबांना मात्र आपल्या पालातच राहावे लागत आहे़ ना अंगावर कपडा, ना मिठाई, लाकडे शोधून आणल्याशिवाय या कुटुंबाची चूलही पेटत नाही़ तरीही या कुटुंबातील चिमुकल्यांना त्या सुखाची तमा नाही़ त्यामुळे ही मुले कपड्याविना मोठ्या आनंदात खेळाचा आनंद घेताना दिसून आले़ दुसरीकडे पालाच्या बाजुलाच असलेल्या इमारतीमध्ये लख्ख प्रकाश, रोषणाई, आकाशकंदील दिसत होते़ परंतु, पालांमध्ये मात्र अंधार आणि अंधारचपहायला मिळत होता़ तरीही या पालावरच्या जीवनाला आनंदाने स्वीकारत या कुटुंबातील महिलांसह चिमुकले भीकमागून उदरनिर्वाह करताना दिसून येत होते़
ना कपडे, ना मिठाई, कशी करावी दिवाळी साजरी ?
By admin | Updated: November 12, 2015 03:13 IST