शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नो सेलिब्रेशन ओन्ली कम्युनिकेशन

By admin | Updated: November 1, 2016 04:14 IST

वर्षपूर्ती हे काही ‘सेलिब्रेशन’ नसते. त्यामुळे सरकारला दोन वर्षे झाली

नागपूर : वर्षपूर्ती हे काही ‘सेलिब्रेशन’ नसते. त्यामुळे सरकारला दोन वर्षे झाली, त्याचे ‘सेलिब्रेशन’ न करता ‘कम्युनिकेशन’वर भर द्या. लोकांशी संवाद साधता येतील, असे कार्यक्रम घ्या. आजवर जितकी कामे झाली नसतील तितकी कामे केंद्र व राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात केली आहेत. सरकारने केलेली ही कामे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शहर भाजपातर्फे सोमवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व महापौर प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तसेच केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे प्रमुख अतिथी होते. आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल बोंडे, आ. अनिल सोले, उपमहापौर सतीश होले, अर्चना डेहणकर, विश्वास पाठक, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, सुभाष पारधी व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षात देशात सर्वाधिक गुंतवणूक (एफडीआय) आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्याचे वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य केले जात आहे. नीती आयोगाने सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार शेतीपणनमध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या आवाहनानुसार गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील नऊ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्हे हे महराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण ११८ पैकी ५२ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. जनधन योजनेत सर्वाधिक खाते महाराष्ट्रात उघडण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र काम केले जात आहे. डिजिटलायझेशन केले जात आहे.