शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नो सेलिब्रेशन ओन्ली कम्युनिकेशन

By admin | Updated: November 1, 2016 04:14 IST

वर्षपूर्ती हे काही ‘सेलिब्रेशन’ नसते. त्यामुळे सरकारला दोन वर्षे झाली

नागपूर : वर्षपूर्ती हे काही ‘सेलिब्रेशन’ नसते. त्यामुळे सरकारला दोन वर्षे झाली, त्याचे ‘सेलिब्रेशन’ न करता ‘कम्युनिकेशन’वर भर द्या. लोकांशी संवाद साधता येतील, असे कार्यक्रम घ्या. आजवर जितकी कामे झाली नसतील तितकी कामे केंद्र व राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात केली आहेत. सरकारने केलेली ही कामे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शहर भाजपातर्फे सोमवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व महापौर प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तसेच केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे प्रमुख अतिथी होते. आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल बोंडे, आ. अनिल सोले, उपमहापौर सतीश होले, अर्चना डेहणकर, विश्वास पाठक, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, सुभाष पारधी व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षात देशात सर्वाधिक गुंतवणूक (एफडीआय) आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्याचे वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य केले जात आहे. नीती आयोगाने सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार शेतीपणनमध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या आवाहनानुसार गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील नऊ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्हे हे महराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण ११८ पैकी ५२ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. जनधन योजनेत सर्वाधिक खाते महाराष्ट्रात उघडण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र काम केले जात आहे. डिजिटलायझेशन केले जात आहे.