शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

निर्मलग्राम पुरस्कार योजना खंडीत !

By admin | Updated: November 10, 2015 23:36 IST

पाणी पुरवठा विभागाचे आदेश;जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानाला फटका बसणार.

राजेश शेगोकार / बुलडाणा : ग्राम स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणारी निर्मल ग्राम पुरस्कार योजना खंडीत करण्याचे आदेश राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ६ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्य शासनाने सन २00३ पासून राज्यात निर्मल ग्राम योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गंत गावागावात शौचालय बांधकामाची चळवळ सुरू करण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम योजनेत सहभाग घेवून गाव हागणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपले गाव निर्मल व्हावे म्हणून गावांमध्ये स्पर्धा सुरू होती. अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कारही पटकावले होते. शासनाच्या आदेशाने आता हागणदारी मुक्तीची स्पर्धाच संपुष्टात येणार आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सांभाळणारे बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यादव यांना विचारले असता अशा आशयाचे पत्र आल्याच्या माहीतीला दुजोरा दिला. २00५ ते २0१५ पर्यंत एकूण ६४ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त गावाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला. या निधीमधून विकासाची कामे झाली. मात्र, पाणी पुरवठा विभागाच्या संचालकांनी ६ नोव्हेंबरच्या पत्राद्वारे केंद्र शासनानेही ही योजना खंडीत करीत असल्याचे सर्व जिल्हा परिषदांना सूचीत केले आहे. या आदेशामुळे जिल्हा परिषदांच्या स्वच्छता कार्यक्रमांना फटका बसणार आहे. सपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानांतर्गत ग्रामंपचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छतेबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी निर्मल ग्राम पुरस्काराचे सन २00३ पासून मोठे योगदान होते. केंद्र शासनाच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जात होता.