शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलग्राम पुरस्कार योजना खंडीत !

By admin | Updated: November 10, 2015 23:36 IST

पाणी पुरवठा विभागाचे आदेश;जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानाला फटका बसणार.

राजेश शेगोकार / बुलडाणा : ग्राम स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणारी निर्मल ग्राम पुरस्कार योजना खंडीत करण्याचे आदेश राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ६ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्य शासनाने सन २00३ पासून राज्यात निर्मल ग्राम योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गंत गावागावात शौचालय बांधकामाची चळवळ सुरू करण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम योजनेत सहभाग घेवून गाव हागणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपले गाव निर्मल व्हावे म्हणून गावांमध्ये स्पर्धा सुरू होती. अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कारही पटकावले होते. शासनाच्या आदेशाने आता हागणदारी मुक्तीची स्पर्धाच संपुष्टात येणार आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सांभाळणारे बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यादव यांना विचारले असता अशा आशयाचे पत्र आल्याच्या माहीतीला दुजोरा दिला. २00५ ते २0१५ पर्यंत एकूण ६४ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त गावाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला. या निधीमधून विकासाची कामे झाली. मात्र, पाणी पुरवठा विभागाच्या संचालकांनी ६ नोव्हेंबरच्या पत्राद्वारे केंद्र शासनानेही ही योजना खंडीत करीत असल्याचे सर्व जिल्हा परिषदांना सूचीत केले आहे. या आदेशामुळे जिल्हा परिषदांच्या स्वच्छता कार्यक्रमांना फटका बसणार आहे. सपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानांतर्गत ग्रामंपचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छतेबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी निर्मल ग्राम पुरस्काराचे सन २00३ पासून मोठे योगदान होते. केंद्र शासनाच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जात होता.